जीवघेणा खेळ !

चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील नवीन सिद्ध केलेला कृत्रिम धावमार्ग केवळ पाचच दिवसांत उखडला !

धावमार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणे यात भ्रष्टाचार झाला नसेल कशावरून ? कोट्यवधी रुपये खर्चून सिद्ध केलेला धावमार्ग पाचच दिवसांत कसा उखडतो ? अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणार्‍यांकडून पैसे वसूल करायला हवेत !

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे कोल्हापूरच्या ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे चित्तथरारक सादरीकरण !

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अयोध्या येथे उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने श्रीराम उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतातील सर्व राज्यांतील नामवंत प्रसिद्ध संस्कृतीचे लोककलेचे सादरीकरण करण्यात येत आहे.

७ कोटींहून अधिक जणांचा ‘ऑनलाईन’ रमी खेळात सहभाग !

कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्‍या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !

SAFF U19 Women : भारत विजयी झाल्याने बांगलादेशी संघ आणि दर्शक यांच्याकडून गोंधळ अन् हिंसा !

भारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !

सातारा येथील धर्मप्रेमी कु. लीना सावंत हिची धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड !

नागेवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या वर्गातील प्रशिक्षणार्थी कु. लीना रघुनाथ सावंत हिची ‘धनुर्विद्या’ या क्रीडा प्रकारात शिवाजी विद्यापिठाच्या संघात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

R Praggnanandhaa : भारताचा बुद्धीपळपटू प्रज्ञानंद याने चीनचा जगज्जेता बद्धीबळपटू डिंग लिरेन याचा केला पराभव !

जगज्जेत्या बुद्धीबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्‍वनाथन् आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Hamas Supporter : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याला अनुमती देण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नकार !

भारतातील किती हिंदु क्रिकेटपटू काश्मीर अथवा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयी बोलतात किंवा त्याचा सार्वजनिकरित्या विरोध करतात ?

भाव-भावनांतील दुजाभाव !

उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्‍खलन अशा अनेक आपत्ती येण्‍याचे प्रमाण वाढत आहे. यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्‍याने वेगवेगळ्‍या प्रकारच्‍या येणार्‍या अडथळ्‍यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्‍य आहे का ?’, याचेही चिंतन करण्‍याची वेळ आली आहे.

क्रिकेट जिहाद ?

पाकचे क्रिकेटपटूही विविध प्रसंगांमधून भारताची मानहानी करण्‍याची एकही संधी सोडत नाहीत. त्‍यामुळे यापुढील काळात पाकिस्‍तानच्‍या ‘क्रिकेट जिहाद’ला पाकिस्‍तानशी क्रिकेट खेळण्‍यावर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालणे, हेच योग्‍य उत्तर ठरेल !