गोहत्या प्रकरणी कडूस परिसरात (पुणे) जमावबंदीचे आदेश लागू !

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून या दिवशी येथील अवैध पशूवधगृहावर बजरंग दलाचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या साहाय्याने पोलिसांनी धाड टाकली होती. या वेळी दिवसाढवळ्या चालू असलेला गोहत्येचा प्रकार उघडकीस आला.

जळगाव येथे २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना अटक !

शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे.

अमरावती भागात बकरी ईदला जागो-जागी गोवंशियांची हत्‍या

पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर महाराष्‍ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्‍यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि विविध कलमान्‍वये गुन्‍हे नोंद केले आहेत.

कडूस (पुणे) येथे गोहत्‍येच्‍या निषेधार्थ गावकर्‍यांचा मोर्चा !

येथील कडूस (ता. खेड) येथे २९ जून या दिवशी गोहत्‍या केल्‍याची घटना समोर आल्‍याने कडूस गावात निषेधमोर्चा काढण्‍यात आला. मोर्च्‍यामध्‍ये सहस्रो युवक सहभागी झाले होते.

मडगाव (गोवा) येथील रुमडामळ हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी असलेला मदरसा तात्पुरता बंद

रुमडामळ पंचसदस्य वळवईकर यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर हिंदु आणि मुसलमान वादावरून वातावरण अशांत झाले होते. श्री. वळवईकर यांनी ‘हा मदरसा बंद करावा, तसेच येथील गोमांस विक्री केंद्रांवर नियंत्रण असावे’, अशी मागणी ग्रामसभेत केली होती.

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे डिचोली (गोवा) येथे २५ गोवंशियांना जीवदान

गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?

आषाढी एकादशी असल्याने ‘बकरी ईद’निमित्त गोवंशियांची, तसेच अन्य पशूंची सार्वजनिक ठिकाणी होणारी हत्या रोखा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना करा ! – अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, अध्‍यक्ष, विधानसभा

भरारी पथकांची स्‍थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्‍यात यावी. त्‍याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्‍याच्‍या, आक्रमणांच्‍या वाढत्‍या तक्रारींची तात्‍काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्‍यात यावेत, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

आषाढी वारीच्या कालावधीत गोवंशियांची तस्करी आणि हत्या रोखा !

२९ जून या दिवशी असणार्‍या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये.

‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर उसगाव (गोवा) येथील पशूवधगृहाच्या परिसरात ५ दिवसांचा जमावबंदी आदेश लागू

‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?