श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्या !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर…

अनिल देशमुख यांची मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय संस्कृतीला काळीमा ! – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

भ्रष्टाचार्‍यांचे उदात्तीकरण करणार्‍या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची कठोर टीका

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी मुख्य सचिवांना लक्ष घालण्यास सांगणार !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही चौकशी बंद करणे, हा न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान आहे.

‘तुळजापूर फाइल्स’ !

आपल्या देशात सरकारी पातळीवर भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे की, तो सार्वजनिक जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. भ्रष्टाचार करण्याजोगी सर्व क्षेत्रे संपल्यानंतर राजकारण्यांनी त्यांचा मोर्चा हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्याकडे वळवला आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथील कृषी साहाय्यकास लाच स्वीकारतांना अटक !

लाचखोरांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही !

धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत ‘बायोमायनिंग’च्या कामामध्ये अपव्यवहार करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करणार ! – मंत्री उदय सामंत

धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत बायोमायनिंगच्या कामामध्ये अपव्यहार करणार्‍या दोषींवर कठोर कारवाईची मागणी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केली.

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने संमत !

केंद्रशासनाच्या लोकपाल कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करण्यासाठीचे लोकायुक्त विधेयक २८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. यापूर्वीच्या कायद्यामध्ये पालट करून नव्या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाचाही समावेश कण्याची तरतूद असणार आहे.

शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये अयोग्य प्रकार चालू आहे का ?, याची पडताळणी करू ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शालेय पोषण आहाराच्या अन्न तपासणीची यंत्रणा अत्यंत कुचकामी आहे. त्यामुळे सक्षम तपासयंत्रणा शासनाने निर्माण करावी. राज्यात पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे साटेलोटे आहे.

भ्रष्टाचाराची चौकशी सरकारी अधिकार्‍यांकडून परस्पर बंद !

भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देवनिधी लुटणारे महापापीच होत. अशांना शिक्षा न करणे, हा एक प्रकारे धर्मद्रोहच आहे ! भ्रष्टाचार्‍यांसह त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्वांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील वेळकाढूपणा !

श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये काही वर्षांपूर्वी अपहार झाला. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये हिंदु जनजागृती समितीने याचिका  प्रविष्ट केली आहे. या सुनावणीविषयी आणि सरकारने घेतलेली भूमिका याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.