मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर आहे का ?, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. कारण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन करून १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रहित करा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने जनतेची पूर्णतः फसवणूक केली ! – आमदार सुधीर गाडगीळ

राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे.

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ! – आयुक्त

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

पुण्यातील प्रस्तावित साथरोग रुग्णालय ठाणे येथे उभारण्याचा निर्णय

जगभरातील विविध आजारांच्या साथींचा संसर्ग पुण्यात सातत्याने दिसत आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ आता ११ वर्षांनंतर कोरोना महामारीची साथ पुणे येथे  मुंबईपेक्षा अधिक तीव्रतेने आहे. त्यामुळे पुण्यात साथरोग रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक आहे.

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करण्याची कोल्हापूर महापालिका प्रशासनाची युद्धपातळीवर सिद्धता

कोरोना विषाणूचा संसर्ग चालू झाल्यावर मार्चमध्ये सर्व शाळा बंद करण्यात आल्या. अखेर शासनाच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या ११२ शाळा चालू करण्याची महापालिका प्रशासनाची युद्धपातळीवर सिद्धता चालू आहे. 

नाशिक येथील फादर रुडी यांच्यावर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार

येथील फादर रुडी यांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनास्थितीची जाणीव असलेल्या फादर रुडी यांच्या अंतिम इच्छेनुसारच पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्यावर ‘अग्निसंस्कार’ करण्यात आले.

लसीची प्रतिक्षा…!

‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येणार्‍या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण

जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून एकूण ४ सहस्र ८३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

कोविड महामारीमुळे लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये ७० टक्के वाढ ! – सुषमा मांद्रेकर, अध्यक्ष, गोवा बाल हक्क आयोग

कोरोना महामारीमुळे गेले कित्येक मास घरी बसून काढावे लागल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. या कालावधीत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येत ७० टक्के वाढ झाली असल्याची माहिती गोवा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांनी दिली.

विनामास्क फिरणार्‍यांवर मालवण नगरपरिषदेची कारवाई

मालवण नगर परिषदेकडून  शहरात कोरोनाविषयक नियमांची काटेकोर कार्यवाही करतांना गेले काही मास विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत मागील  १० दिवसांत १० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.