छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. हे कार्य ‘दैवी’ माणसे घडवू शकतात. छत्रपती हे दैवी होते.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे घेतले दर्शन !

दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. राजेंद्र गवई आदींनी शहा आणि फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.

पुणे येथील ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा ‘सरकारवाड्या’चे १९ फेब्रुवारीला लोकार्पण !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’च्या वतीने नर्‍हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशी लोकार्पण होणार आहे.

म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवून तेथील शेतकर्‍यांचा पाण्याचा तुटवडा दूर केला ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.

गोवा शासनाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट 

या वेळी म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरणाची तात्काळ स्थापना करण्याची विनंती केली आणि कर्नाटकचा संमत केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) मागे घेण्याची विनंती केली.

म्हादई प्रकरणी शासनाचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार

केंद्रीय जलआयोगाने कळसा आणि भंडुरा अहवाला’ला (डी.पी.आर्.) दिलेली मान्यता रहित करावी आणि यासाठी गोवा सरकारने केंद्रावर दबाव आणावा, अशी जनभावना आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गृहमंत्र्यांसमवेत होणारी बैठक महत्त्वाची आहे.

आदिवासी तरुणींशी बलपूर्वक विवाह करून घुसखोर त्यांच्या भूमी कह्यात घेत आहेत ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आदिवासींची नोकरी आणि मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सोरेन सरकारने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला धोका दिला आहे, असा आरोप शहा यांनी केला.

राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा केले सुरक्षा नियमांचे उल्लंघन !

अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर अनुचित घटना घडली, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे !

मराठी भाषिकांवर अत्याचार होऊ नये, ही ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांपुढे मांडली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

काँग्रेसची सत्ता असतांना कधीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला नव्हता. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा भागाच्या प्रश्नासाठी स्वत:हून वेळ दिला.

भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !