नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर !
साहित्याच्या सर्वच प्रांतात साहित्य निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे. सावरकर यांच्या नाटकांचे विषय हृदयाला सतत जाळणारे, मस्तकाला सतत चिंतनाचे खाद्य पुरवणारे आणि कृतीप्रवण करणारे आहेत.