दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घाला !

गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !

गोव्यात वर्ष २०११ पासून ३ सहस्र २८६ लोकांनी केल्या आत्महत्या !

शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक ! साधनेमुळे प्राप्त होणार्‍या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. ‘प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे’, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते.

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी अभ्यास समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.

समृद्धी महामार्गावर ८ मासांत ७२९ अपघात : १०१ जणांचा मृत्यू !

वाहनचालकांनी नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने सतत प्रबोधनाची मोहीम राबवावी !

(म्हणे) ‘भारतीय उद्योग समूहांचे घोटाळे उघडकीस आणणार !’ – ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’

येणार्‍या काळात कट्टर भारतद्वेषी व्यक्ती अन् संघटना एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करतील, हेच यातून सिद्ध होते !

चोरी आणि खंडणी यांमध्ये सहभागी असलेला पोलीस हवालदार विकास कौशिक सेवेतून बडतर्फ

सराईत चोराने हवालदार विकास कौशिक यांचे कारनामे सांगेपर्यंत ते इतर पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?

केंद्रीय दक्षता आयोगाकडे वर्ष २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या १ लाख १५ सहस्र तक्रारी

देशात एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या १ लाखाहून अधिक तक्रारी येतात, यावरून तक्रारी न येण्याचे प्रमाण किती असणार आणि देशात भ्रष्टाचार किती प्रमाणात होत असणार, हे लक्षात येते !

#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !

#Exclusive : ५ वर्षांत तिकिटात सवलत दिलेल्या प्रवाशांची नोंद न ठेवल्याने एस्.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड !

‘तिकिट यंत्रांमधील तांत्रिक बिघाड कि एस्.टी. महामंडळातील घोटाळा ?’, याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी !

#Exclusive : महाराष्ट्र सरकारच्या थकबाकीमुळेच महावितरण तोट्यात !

वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत कृषी पंपांची थकबाकी न भरलेल्या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महावितरणची थकबाकी ४४ सहस्र ८२५ कोटी रुपयांपर्यंत वाढली.