तुर्भे येथे पुन्हा पदपथावर आंब्याच्या लाकडी पेट्यांचे अतिक्रमण !

तुर्भे येथील ए.पी.एम्.सी. फळ मार्केट ते भाजी मार्केटपर्यंतच्या पदपथावर आंब्याच्या पॅकिंगसाठी लागणार्‍या लाकडी पेट्यांची विक्री करणार्‍यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केला आहे.

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकातून मोगलांच्या संदर्भातील धडे वगळले !

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकातील मोगल आणि त्यांची राजवट यांच्याशी संबंधित धडे सरकारने वगळले.

आतंकवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या ! – सौरभ बोबडे, बजरंग दल

पहलगाम येथे हिंदु पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना आतंकवाद्यांची क्रूरताच नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर केलेले थेट आक्रमण आहे.

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांवर कठोर सैन्य कारवाई करावी !

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांसह त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री. श्याम धनमने, अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ चा लेखापरीक्षण अहवाल अद्याप शासनाला सादर नाही !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ मधील प्रावधानांनुसार चालवण्यात येते. या अधिनियमातील प्रावधानांनुसार प्रतिवर्षी शासन नियुक्त लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षण करण्यात येते आणि त्याचा अहवाल शासन, तसेच धर्मादाय आयुक्त यांना सादर करण्यात येतो.

एस्.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचे परिवहनमंत्र्यांचे निर्देश !

आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनासाठी, एस्.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एस्.टी. महामंडळ प्रशासनाला दिले आहेत.

विक्रोळी येथे समान दिनांकाच्या आधारकार्डाचे १३ बांगलादेशी सापडले !

विक्रोळीमध्ये ‘१ जानेवारी’ हा एकच दिनांक असलेल्या आधारकार्डाचे १३ बांगलादेशी सापडले आहेत. या सर्वांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांचे अन्वेषण चालू आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या आधारकार्डांवर ‘साहेबगंज, झारखंड’ हा एकच पत्ता आहे.

मुंबईत सिमेंट ब्लॉक बनवणार्‍या आस्थापनात अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना 

समाजाला व्यसनाधीन आणि त्याद्वारे उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

दीर्घकालीन ‘व्हिसा’वर आलेल्या सिंधी लोकांना भारत सोडावा लागणार नाही ! – मुख्यमंत्री

केंद्रशासनाच्या निर्देशानुसार पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा, असे आहे; पण सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन ‘व्हिसा’वर भारतात आले आहेत. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही.

जामडूल, आचरा येथे चोरीच्या प्रकरणी मुसलमानाला पोलीस कोठडी

तालुक्यातील आचरा जामडूल येथे एका घरात कुणी नसल्याचे पाहून अज्ञात चोराने २५ एप्रिल या दिवशी घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून ५ लाख ६८ सहस्र ५४० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता.