भारताचे चुकीचे मानचित्र प्रसारित केल्यावरून व्हॉट्सअ‍ॅपकडून क्षमायाचना

केवळ क्षमायाचना केल्याने संबंधितांना सोडून देऊ नये, तर गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा झाली, तर अन्य आस्थापनांना याचा वचक बसेल !

कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय जल आयोगाने लादल्या अटी !

आंतरराज्य आणि जलविज्ञान (हायड्रॉलॉजी) संबंधी पैलूंचे पालन करणे अन् म्हादई जलतंटा लवादाने दिलेल्या निर्णयावर आधारित प्रकल्प उभारणे या अटी आयोगाने कर्नाटक सरकारला घातल्या आहेत.

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी हे करा !

‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुत्वासाठी दिशादर्शक ठरलेली जळगाव येथील अभूतपूर्व हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

२५ डिसेंबरला संपन्न झालेल्या या सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणारच’, अशी शपथ घेतली…

‘स्वस्तिक फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित निवासी शिबिरात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून ‘संगीत आणि नृत्य यांचा स्वतःच्या प्रभावळीवर होणारा परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन !

या कार्यक्रमाला प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये आणि सिंधुदुर्ग येथील वैद्य दिवाकर पंत वालावलकर उपस्थित होते. या शिबिराला गोवा आणि महाराष्ट्र येथील ६० शिबिरार्थीं उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन ‘स्वस्तिक फाउंडेशन’ चे संस्थापक आणि शास्त्रीय गायक डॉ. प्रवीण गावकर यांनी केले.

कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले. संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले; पण त्यांनी मान्य केले नाही. औरंगजेबाने त्यांना का मारले ? स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म यांसाठी त्यांनी हालअपेष्टा सहन करून बलीदान स्वीकारले.

पंतप्रधानांचा मातृसेवेचा आदर्श !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे गुजरात येथे २ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आणि अंत्यविधी यांच्या वेळी नरेंद्र मोदी अन् मोदी कुटुंबीय यांचा साधेपणा जगाने अनुभवला.

छत्रपति संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नहीं थे ! – राष्ट्रवादी कांग्रेस के नेता अजित पवार

इस्लामी राष्ट्रवादी नेताओं को पहचानो !

इस्लामी राष्ट्रवादी नेत्यांना ओळखा !

काही जण छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केले.

कुणी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजित पवार आणि त्यांच्या विचारांचे लोक यांनी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच; पण ते धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.