गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या भाविकांना २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर कालावधीत पथकर (टोल) माफ !

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने चारचाकी वाहनाने कोकणात जाणार्‍या भाविकांना पथकराची आकारणी करू नये, तसेच भाविकांना इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पथकर नाक्यांच्या मालकांना दिला आहे.

विद्यमान सरकारच्या काळात १३७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र चालू आहे. राज्यात प्रतिदिन सरासरी ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून गेल्या ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाकर्ते हरिहर पांडे यांना पाकिस्तानातून मिळाली ठार मारण्याची धमकी !

ज्ञानवापी प्रकरणातील एक याचिकाकर्ते असणारे हरिहर पांडे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून भ्रमणभाषवरून ही धमकी देण्यात आली.

शासनाकडून पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक मूर्ती असलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यशासनाने गणेशोत्सवासाठी राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्‍नमंजुषा !

श्री गणेशाविषयीचे २५ प्रश्‍न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्‍नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे. ही प्रश्‍नमंजुषा मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

इतरांना निःस्वार्थीपणे साहाय्य करणारी आणि सेवेची तीव्र तळमळ असलेली मिरज येथील कु. सिद्धी उमेश पडियार !

सिद्धीमध्ये सेवेची तळमळ आहे. ती झोकून देऊन सेवा करते. ती प्रतिदिन कार्यालयीन काम करून घरी आल्यावर घरातील काम आवरून नंतर सेवा करते. ती कोणत्याही परिस्थितीत सेवा करण्यास नकार देत नाही. तिला रात्रीची सेवा असूनही ती उत्साहाने सेवा पूर्ण करते.

धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार ! – शिवसेना आणि भाजप या पक्षांतील आमदारांचे आश्‍वासन

पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ नगर जिल्ह्यातही आदिवासी महिलांच्या धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री ‘चंगाई (उपचार) सभे’त गंभीर आजार बरे करण्याचा दावा उघडपणे करतांना दिसून आला.

आस्थापनांनी ‘हलाल’चे प्रमाणपत्र घेणे बंद न केल्यास ‘मनसे’च्या पद्धतीने उत्तर देणार !

‘हलाल’ अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. देशातील सर्वांत मोठी ‘टेरर फंडिंग’ यंत्रणा, तसेच जागतिक पातळीवर ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसेने ‘नो टू हलाल’ची मोहीम हाती घेतली आहे,

केरळमधील अवैध धार्मिक स्थळे बंद करा !  

न्यायालयाने म्हटले की, कुराणमध्ये मुसलमान समाजासाठी मशिदींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे; पण ‘प्रत्येक रस्त्याला आणि चौकात मशीद असायला हवी’, असे कुराणमध्ये म्हटलेले नाही. ‘प्रत्येक मुसलमानाच्या घराजवळ मशीद असावी’ असे हदीस किंवा कुराण यांत म्हटलेले नाही.

काँग्रेसच्या महिला नेत्या आयशा फरहीन यांच्याकडून टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी

अशांवर सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार कारवाई करणार कि लांगूलचालनासाठी त्याकडे दुर्लक्ष करणार ?