मंदिर, मठ आदी ठिकाणांपासून ५ किमी परिसरात गोमांसाच्या खरेदी अन् विक्री यांवर बंदी येणार !

आसाम राज्य असा कायदा करू शकतो, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.

कोरोना नियमांचे पालन न केल्यास तिसर्‍या लाटेचा धोका अधिक ! – इंडियन मेडिकल असोसिएशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रीय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांचा सेवाभाव यांमुळे भारत कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे; पण तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे.

सिंहगड, खडकवासला (पुणे) येथे येणार्‍या पर्यटकांकडून ८८ सहस्र रुपयांचा दंड वसूल !

हवेली पोलिसांनी सिंहगड आणि खडकवासला परिसरात येणार्‍या १७७ पर्यटकांवर कारवाई करून ८८ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

निधन वार्ता

कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका जयश्री नाईक यांचे पती जनार्धन व्यंकटेश नाईक (वय ८५ वर्षे) यांचे १२ जुलै या दिवशी हृदयविकाराने निधन झाले.

महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याच्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

महाकवी कालिदास रचित ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा ऋतुसंहार…एक रसानुवाद या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत दोन्ही बाजूंच्या किमान २ प्रतिनिधींना बोलवणे आवश्यक ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्टमंडळे काल आणि आज मला भेटण्यास आले होते. या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

राज्यातील कारागृहांच्या जागेवरील अतिक्रमणे हटवणार ! – सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक

कोल्हापुरात कळंबा कारागृहाच्या परिसरातही अशाच प्रकारे अतिक्रमण उभारले आहे. तरी राज्यातील सर्व कारागृहांच्या शासकीय जागांचे मोजमाप करून त्या ठिकाणी संरक्षित कठडे उभे केले जातील.

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये २ गट पडले आहेत ! – काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर जोरदार टीका करतांनाच त्यांनी अनेकदा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही सडकून टीका केली आहे.