महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक !

महाराष्ट्रातून  कर्नाटकात प्रवेश करणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अहवाल किंवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला असल्याविना प्रवेश दिला जाणार नाही.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘ओबीसी’ आरक्षणासाठी ‘चक्काजाम’ आंदोलन

‘ओबीसीं’ना न्याय न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

पू. वैद्य विनय भावेकाका यांच्या देहत्यागाची वार्ता समजल्यावर काही वैद्यांनी सामाजिक माध्यमांमध्ये उत्स्फूर्तपणे केलेले लिखाण

कठीण शारीरिक स्थितीतही साधकांसाठी अहोरात्र झटणारे पू. वैद्य भावेकाका !

हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांच्या षड्यंत्राच्या विरोधात धर्माभिमान्यांचा #Hinduphobic_Media हा ट्विटर ट्रेंड !

तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या २५ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका

गोमाता आणि गोवंश यांचे रक्षण करणार्‍या पोलिसांचे अभिनंदन ! राज्यात गोवंशियांच्या कत्तलीच्या वारंवार होणार्‍या घटना रोखण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

अमरावती येथील शिवसेनेच्या तिवसा शहरप्रमुखांची निर्घृण हत्या !

जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील एका वाईन बार परिसरात २६ जूनच्या रात्री शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील (वय ३४ वर्षे) यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांचे त्यागपत्र !

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी त्यांच्या कार्यालयामधील त्यांच्या सहकारी महिलेचे चुंबन घेतल्याने त्यांना त्यागपत्र द्यावे लागले आहे. या चुंबनाचा व्हिडिओ आणि छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले.

कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत जाणार असल्याने प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपये देऊ शकत नाही !

सर्वोच्च न्यायालयात सरकारचे दुसरे प्रतिज्ञापत्र !
डिसेंबरपर्यंत २१६ कोटी नाही, तर केवळ १३५ कोटी डोस उपलब्ध होणार ! – केंद्रशासनाचा नवा दावा

बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना हाकलून द्या ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

बंगाल राज्यातून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशांत हाकलून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

भारतातील शासनकर्त्यांनी वेदादी शास्त्रसंमत दर्शनविज्ञान पृथ्वीवर लागू करण्याचे व्रत घेतल्यास कोरोनाची महामारी समाप्त होईल ! – पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

निसर्गाने जगाला आणि भारताला धडा शिकवून जो संकेत दिला आहे, तो मी समजून चुकलो आहे. भगवंताच्या कृपेने कोरोनाची ही महामारी दूर व्हावी.