कुंभमेळ्यातील संतांच्या व्यवस्थेसाठी विशेष समितीची स्थापना ! – बंशीधर भगत, शहरविकास मंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या संतांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष समिती बनवण्यात आल्याचे शहरविकास मंत्री बंशीधर भगत यांनी घोषित केले.

हरिद्वारमध्ये लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करणार ! – मुख्य वैद्यकीय अधिकारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

चीनच्या अणूबॉम्ब डागणार्‍या लढाऊ विमानांची तैवानच्या सीमेमध्ये घुसखोरी !

चीन छोट्याशा तैवानवर कशा प्रकारे दबाव निर्माण करत आहे, हे यातून लक्षात येते. चीनचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यापासून भारतालाही धोका आहे. त्याला रोखायचे असेल, तर भारताने आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक !  

वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनापासून पूर्णपणे मुक्त होईल ! – बिल गेट्स

वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल आणि परत मूळ पदावर येईल, असे विधान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. पोलंडचे वृत्तपत्र गॅझेटा वायबोर्झा आणि ‘टीव्हीएन् २४’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

बाटलीबंद पाणी विक्रीसाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र आवश्यक ! – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा नवा नियम

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.आय.’ने) बाटलीबंद पाणी आणि मिनरल पाणी उत्पादकांसाठी भारतीय मानक ब्युरोचे (बी.आय.एस्.’चे) प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून हा नियम लागू होणार आहे.

आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !

बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर आक्रमण

बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !

कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बांगलादेशातील ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्‍वरी काली मंदिरात प्रार्थना ! ‘कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर.’ मला संधी मिळाली, तर मी या ५१ शक्तीपिठांमध्ये जाऊन डोके टेकवेन.

भारत घुसखोरांची राजधानी नाही !  

भारत जगातील घुसखोरांची राजधानी नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सरकार कायद्यानुसार आपले काम करत आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नमूद केले.

केरळमध्ये मागील ५ वर्षांत ६५ सहस्र कोटी रुपयांची मद्यविक्री !

केरळमधील जनतेला मद्यपी बनवण्याचा घाट घालणारे जनताद्रोही साम्यवादी सरकार ! महसुलाच्या हव्यासापायी जनतेच्या आरोग्याशी खेळणारे साम्यवादी सरकार जनहित काय साधणार ?