अभिनेता सोनू सूद यांची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

सोनू सूद यांनी जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये व्यावसायिक वापरासाठी महापालिकेची अनुमती न घेता परस्पर पालट केले.

दिग्दर्शक अली जफर यांसह ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून संमत

‘तांडव’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांसाठी उत्तर प्रदेशात गुन्हा नोंद झाला असून पुढील कारवाईसाठी लखनौ येथून पोलीस मुंबईत आले आहेत.

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकावण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले

या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्‍या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.

जळगाव येथे ख्वाजामियाँ चौकातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले !

देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !

तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत भाजपकडे 

दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्रातील संत परंपरा दर्शवणारा चित्ररथ पथसंचलानात सहभागी होणार

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी देहलीत ‘इंडिया गेट’जवळील राजपथावर होणार्‍या पथसंचलनात महाराष्ट्रातील संत परंपरा दर्शवणारा चित्ररथ सहभागी होणार असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

खासगी अधिकोषांना शासकीय अधिकोष व्यवहार हाताळण्यास अनुमती

खासगी अधिकोषांना मर्यादित प्रमाणात शासकीय अधिकोष व्यवहार  हाताळण्यास अनुमती देण्यासह अन्य निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात नियमभंग करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार – अनिल देशमुख, गृहमंत्री

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळातील नियमभंगाचे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख केली.

गडचिरोली येथे विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना बाधा

दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !