नामजप आणि प्रार्थना करतांना अंतरीचा भाव जागृत होण्यास साहाय्य करणारे भावप्रयोग !

नामजप आणि प्रार्थना भावपूर्ण झाल्यास देवाला अनुभवता येते. त्यामुळे प्रार्थना करतांना इष्टदेवतेचे रूप डोळ्यांसमोर आणून डोळे मिटून ते रूप आठवत चरणांवर दृष्टी स्थिर ठेवल्यास अंतरीचा भाव जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठी करावयाचे काही भावप्रयोग पुढे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी झाले आहेत. हे त्यांच्या देहात स्थुलातून झालेले दैवी पालट आहेत. अशा प्रकारे देहामध्ये दैवी पालट होण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.

बालसत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मानस पाद्यपूजा करतांना ‘ते प्रत्येक बालसाधकासाठी वेगवेगळे रूप घेऊन आले आहेत’, असे अनुभवणारी कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) !

मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असल्याने मी बालसाधकांच्या सत्संगात ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.

आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी !

आदर्श भक्ती म्हणजे ‘गोपींच्या भक्तीसारखी’ एवढीच उपमा दिली जाते; कारण भक्तीचे वर्णन होऊ शकत नाही. ती शब्दांकित होऊ शकत नाही; कारण ती अर्थांकित आहे; म्हणून ‘भक्ती कशी असावी, तर गोपींसारखी’, हे त्याचे उत्तर असते.

भक्ती म्हणजे काय ?

भगवंताची भक्ती करणे, म्हणजे सुख आणि भगवंताला विसरणे, म्हणजे दुःख. याची जाणीव साधना करणाऱ्या भक्ताला असल्यामुळे तो आर्ततेने सतत देवाला आळवत असतो.

सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. यातील पहिले ३ प्रकार परमेश्वराप्रती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी साहाय्यक ठरतात. पुढचे ३ हे भगवंताच्या सगुण रूपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे.

भावसूचना

भावजागृतीचे प्रयत्न करतांना प्रारंभी प्रत्येक कृतीला भाव जोडायचा आहे, हे सातत्याने लक्षात रहात नाही. यासाठी सूचना द्यायला हवी. रामनाथी आश्रमातील सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी सांगितलेली भावसूचना पुढे दिली आहे.

समष्टी भाव वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करत आहे, तसेच ईश्वराचे कार्यही माझेच आहे, या प्रकारचा भाव आणि त्यातून ईश्वरेच्छेने घडणाऱ्या कृतीला ‘समष्टी भाव’ म्हणतात.