निवडणुकांचे दुष्परिणाम !

‘निवडणुका राजकारणी आणि जनता यांना स्वार्थ शिकवतात, तर साधना सर्वस्वाचा त्याग शिकवते. यामुळे भारतात पूर्वी निवडणुका नव्हत्या, तर सर्वजण साधना करायचे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगार होत !

भ्रष्टाचार्‍याची पत्नी आणि १८ वर्षे वयावरील मुले, नातेवाईक, ओळखीचे, कार्यालयातील सहकारी इत्यादींनाही भ्रष्टाचारी हा पगारापेक्षा अधिक पैसे कमवत असल्याची तक्रार न केल्याविषयी गुन्हेगाराचे साथीदार म्हणून आजन्म कारागृहात टाका ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पाश्चात्त्य आणि भारतीय संगीत अन् नृत्य

‘पाश्चात्त्य देशांत गायन आणि नृत्य केवळ सुखासाठी करतात. याउलट भारतात संगीत आणि नृत्य साधनेचे प्रकार म्हणून ६४ कलांच्या अंतर्गत होते. त्यामुळे संगीत आणि नृत्य साधनेमध्ये ध्यानाप्रमाणे स्थिर न बसताही, म्हणजे गातांना आणि नृत्य करतांना ध्यान लागते ! भक्तीगीते गातांना किंवा समवेत नृत्य करतांना भावही जागृत होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे जागतिक केंद्र असलेल्या भारतासाठी हे लज्जास्पद !

‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मशिक्षणाच्या अभावी आत्मघात करून घेणारे हिंदू !

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळेच आनंदप्राप्ती होते !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ प्रवचने नकोत, तर हेही करा !

‘रामायण, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर केवळ प्रवचने नकोत, तर वानरसेना, मावळे सिद्ध करायला हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वच क्षेत्रांमधील अधोगती, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी !

‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र होणे, भारतातील धर्मांधांनी ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे’, असे म्हणणे आणि भारतात सर्वत्र आतंकवादी असणे, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी आहे. त्या विचारसरणींना हरवून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगती होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत आणि राजकारणी यांच्यातील भेद !

‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माकडे इतर धर्मीय आकर्षित होण्यामागील कारण !

‘इतर धर्म भीती अथवा लालूच दाखवून परधर्मियांना आपल्या धर्मात खेचतात, तर हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळे आनंदप्राप्ती होत असल्याने इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षित होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले