परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्या छायाचित्रापेक्षाही त्यांचे रूप अधिक तेजस्वी जाणवणे

सामान्य व्यक्तीला प्रत्यक्ष पहाण्यापेक्षा छायाचित्रात ती अधिक चांगली दिसते.सनातनच्या आश्रमात गेल्यावर प्रथमच श्री गुरुदेवांना पाहिल्यावर मला त्यांचे रूप त्यांच्या छायाचित्रापेक्षाही अधिक तेजस्वी जाणवले.

साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !

‘हे सर्व देवाचे आहे, त्याचे त्यालाच द्यायचे आहे’, यासारख्या नि:स्वार्थ विचाराने आणि भावाच्या स्तरावर कृती केल्यास ईश्वराचा आशीर्वाद लाभून जलद आध्यात्मिक उन्नती होते.’

उत्तम आकलनक्षमता, प्रेमभाव आणि सात्त्विकतेची ओढ असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय ४ वर्षे) !

नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी २ दिवस ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र रुक्मिणीने ऐकला. तेव्हा तिला तो लगेचच मुखोद्गत झाला आणि तिने तो अचूक म्हणून दाखवला.

महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेला ‘निर्विचार’ हा नामजप म्हणजे साधकांच्या हाती दिलेला अमृतकुंभ !

‘निर्विचार’ हा नामजप आपण कधीच कुठे वाचलेला नाही किंवा ऐकलेला नाही, तरी हा जप इतका प्रभावी आहे. यावरून ‘हा नामजप महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकल्पाने सिद्ध केला आहे’, असे मला जाणवले.

अशांना सनातनच्या आश्रमात पाठवू नका !

वर्ष २०२३ मध्ये एक सुप्रसिद्ध गायिका रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. आश्रमात चालणार्‍या विविध सेवांविषयी आणि त्या-त्या सेवेशी संबंधित माहिती ऐकून न घेता त्या पुढे-पुढे जात होत्या. आश्रमात चालू असलेल्या एका शिबिरातील एका सत्राला त्या बसल्या. त्यात चालू असलेला विषय पूर्ण न ऐकताच त्या मध्येच बाहेर आल्या. ‘सनातन प्रभात’चे कार्यालय पहातांना ‘हिंदु राष्ट्रा’वरून … Read more

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौर्‍यावर आले असता ही भेट झाली. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, तसेच अन्य उपस्थित होते.

वेळप्रसंगी १४ गावांतील जनतेला घेऊन जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन ! – राजू यादव

सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम चालू असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, उंचगाव या रस्त्यावर खोदाईचे काम चालू असून गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणीयोजनेच्या वाहिनीस गळती लागली आहे.

देशातील अशी सर्व ठिकाणे हिंदूंना परत द्या !

ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचा आदेश पुरातत्व विभागाला दिला आहे. राजा भोजने बांधलेली ही भोजशाळा एक विद्यापीठ होते.

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण !

देशात ७ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९ सहस्र ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यय करून १५ विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

श्रीरामनगर (अहिल्यानगर) येथे ‘अतुल्य सन्मान’ पुरस्काराचे वितरण !

‘महा एन्.जी.ओ. फेडरेशन’ आणि ‘महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अतुल्य सन्मान’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम ९ मार्च या दिवशी आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयासमोर, श्रीरामपूर येथे संपन्न झाला.