कोल्हापूर येथून सुटणार्या दोन पॅसेंजर रेल्वेगाड्या २ मार्चपर्यंत रहित
या गाड्या रहित झाल्याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, तसेच कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस याच गाड्या उपलब्ध आहेत. याचसमवेत कोल्हापूर-हरिप्रिया ही रेल्वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्कळ हाल होणार आहेत.