कोरोना काळात नागरिकांमध्ये एकी निर्माण करणे, हाच थाळीनाद आणि घंटानाद यांमागचा उद्देश होता ! – पंतप्रधान
प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) अशा सूत्रांसह कोरोना काळातील व्यवस्थापनावरही मोदी यांनी भाष्य केले.