साधक असे अपूर्ण, गुरु माझा तो पूर्णब्रह्म ।
गुरुदेवा, शब्दब्रह्म ते अपुरे, तुझे वर्णन करावया ।
कोणती वाणी आणू, तुझे वर्णन करावया ।
कशी होऊ उतराई ॥ १ ॥
गुरुदेवा, शब्दब्रह्म ते अपुरे, तुझे वर्णन करावया ।
कोणती वाणी आणू, तुझे वर्णन करावया ।
कशी होऊ उतराई ॥ १ ॥
भगवंताच्या प्रेमापुढे हरणं-जिंकणं शून्य असते ।
जिंकणारा तोच एक असतो, तो अजिंक्यच आहे ।
माझा भारत त्याचा आहे, तो भारत अजिंक्य ठरेल ।
हे भावमय भावसत्संगा ।
हे गुरुदेवांचे चैतन्य देणार्या महास्रोता ।
त्वरेने ये हे भावसत्संगा ॥ १ ॥
साधकांकडून साधनेसाठी तुटपुंजे प्रयत्न होत असले, तरी परात्पर गुरु डॉक्टर आणि आश्रमातील संत यांचे अस्तित्व अन् आश्रमातील चैतन्य यांमुळेच साधकांचे रक्षण होत आहे’, याची जाणीव मला झाली. त्या प्रसंगी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होतांना मला ‘संत’ या शब्दाची गुणवैशिष्ट्ये सांगणारी पुढील कविता सुचली.
तत्परतेने धावत येतो भक्तांच्या हाकेला श्रीहरि ।
गुरुरूप घेऊन तो सर्व भक्तांना तारी ॥ १ ॥
न समजे हे सर्वांना जरी, कसे भक्तांसंगे रहातो श्रीहरि ।
गोड गुपित हे भक्तांनाच दावतो श्रीहरि ॥ २ ॥
पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा पाठक यांना जून २०१९ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिरात असतांना पुढील कविता सुचली. सौ. मनीषा पाठक यांची मातृभाषा मराठी असूनही त्यांना हिंदीमध्ये कविता सुचली.
बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥
करून स्वतः रहाती नामानिराळे ।
असे माझे गुरु जगात ‘थोरले ’।
सदा त्यांच्या हृदयी साधकांचेच गोडवे ।
असे गुरु मला भाग्यानेच लाभले ॥
सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥
सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥