राष्ट्रीय सामंजस्य हवे !
म्हादईचे पाणी गोवा राज्याला मिळावे, याचा अर्थ कर्नाटक राज्यातील जनतेचे पाण्याविना हाल व्हावेत, असे कोणत्याही गोमंतकियाला वाटणार नाही. केंद्रशासनाने त्यांना अवश्य साहाय्य करावे; परंतु गोमंतकातील मानवजात आणि येथील सामाजिक जीवनाचा आत्माच असलेले जैववैविध्य अबाधित रहाण्यासाठी कठोर भूमिका घेण्यातच भले आहे !