पोलिसांच्या गोपनीय शाखेची निष्क्रीयता !

सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या (‘डिटेक्टिव्ह ब्रँच’च्या) असमाधानकारक कामगिरीमुळे ती शाखाच विसर्जन करण्याची नामुष्की ओढावली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळेच वरिष्ठांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

निवडणुकांचा लाभ कुणाला ?

निवडणुकीत मतदारांना विविध आमिषे दाखवून विजयी होणारे लोकप्रतिनिधी पुन्हा त्या मतदारसंघात जात नाहीत, जनतेची विकासकामे करत नाहीत, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, हे चित्र सर्रास पहायला मिळते. या लोकप्रतिनिधींना ठाऊक असते की, त्यांनी या मतदारांना खरेदी केले आहे, त्यामुळे मला कुणी काही विचारू शकत नाही.

दिवाळी आणि किल्ला !

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळी म्हटले की, अनेक गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या रहातात. त्यात नवीन कपडे खरेदी करणे, सुटीची मौजमजा, आवडीचे पदार्थ खाणे; मात्र या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीचा हळूहळू विसर पडत चालला आहे, तो म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याचा !

शेतकर्‍यांचे हितचिंतक पंजाबराव डख !

शेतकर्‍यांच्या पिकांची हानी टाळण्यासाठी कुणाकडून कसलेही मानधन न घेता अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत शेती आणि हवामान यांचे अनुमान पोचवणारे श्री. पंजाबराव डख हे शेतकर्‍यांचे हितचिंतक बनले आहेत.

सत्यान्वेषी पत्रकारिता !

समाजाला गुन्हेगारी, अमली पदार्थांच्या कह्यात गेलेल्यांचे उदात्तीकरण करणार्‍या नाही, तर या सर्वांचे लागेबांधे उघड करणार्‍या सत्यान्वेषी पत्रकारितेची आवश्यकता आहे !

शेतकरी अडचणीत का ?

वर्षांतील १० मास शेतकर्‍याला दिवस-रात्र घाम गाळूनही अपेक्षित असा आर्थिक लाभ होत नाही आणि त्यातून तो आत्महत्येकडे वळतो, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. शेतकरी मागास का रहात आहे ?

शाळेची घंटा वाजली; पण…!

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या शाळा (मधला काही कालावधी सोडला तर) १८ मासांनी पुन्हा ४ ऑक्टोबरपासून पूर्ववत् चालू झाल्या. बहुसंख्य ठिकाणी ‘शाळा चालू होणार’ याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शाळेशी संबंधित व्यावसायिक यांच्या तोंडवळ्यावर ओसंडून वहात होता.

नैतिकतेचा कडेलोट !

विविध घटनांमध्ये संयम सुटल्यावर तीन पित्यांनी स्वत:च्या लहान मुलांच्या हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

‘स्त्री’ सन्मान !

हिंदु धर्मात ‘स्त्री’ ला अत्यंत सन्मानाचे स्थान आहे. परस्त्री मातेसमान आणि भगिनीसमान मानली गेली आहे. असे विचार समाजामध्ये रुजण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, नैतिकतेचे धडे देणे, तसेच दुष्कृत्य करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे.