बलिप्रतिपदेचे महत्त्व !
धर्मशास्त्र म्हणते की, बळीराज्यात धर्मशास्त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्हणजे मद्यसेवन) आणि अगम्यागमन (वेश्यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.
धर्मशास्त्र म्हणते की, बळीराज्यात धर्मशास्त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्हणजे मद्यसेवन) आणि अगम्यागमन (वेश्यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.
बलीप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्णाद्वारे या दिवशी इंद्रपूजनाच्या ठिकाणी गोवर्धनपूजन आरंभ करण्यात आले. याच्या स्मरणार्थ या दिवशी गोवर्धन पूजन केले जाते.
गोवर्धन पूजेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात.
संसारातील घोर आपत्ती म्हणजे दारिद्य्र ! ही आपत्ती येऊ नये ; म्हणून उत्साहाने, न्यायनीतीने आणि सतत कष्ट करून संपत्ती प्राप्त करावी.
चातुर्मास आणि शरद ऋतू यांचे उत्तररंग म्हणजे दीपावली पर्व ! उत्सव, रोषणाई, संपन्नता, प्रेम आणि भक्ती यांचे हे प्रतीक !
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
ऋग्वेदांतील अदितीपासून ते आजही दारी येणार्या गोंधळींच्या गीतांतील भवानी-रेणुकेपर्यंत शक्तीचा महिमा ऐकावयास मिळतो, तर सिंधूच्या तिरी मिळालेल्या ३ सहस्रांपूर्वीच्या मातृमूर्तीपासून खेडोपाडी आजही प्रभावशाली असलेल्या ग्रामदेवतेपर्यंत तिच्या उपासनेचे सातत्य आढळते.
या दिवसांमध्ये व्रत करणार्याने क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुष्प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. देवीचे आवाहन, पूजन, विसर्जन, पाठ इत्यादी सर्व प्रातःकाळी करणे शुभ असते; म्हणून ते याच काळात पूर्ण केले पाहिजे.
नवरात्री व्रताचे अनुष्ठान करणारे जेवढे संयमाने, नियमितपणे, अंतर्बाह्य शुद्ध रहातील, तेवढ्या प्रमाणात त्यांना सफलता मिळेल, यात संशय नाही. अमावास्यायुक्त प्रतिपदा चांगली मानली जात नाही. ९ रात्रींपर्यंत व्रत करण्यामुळे हे ‘नवरात्री व्रत’ पूर्ण होते.