धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.
सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.
भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ‘श्रीमद्भगवत्गीते’तील संवादात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘मासांमध्ये (महिन्यांमध्ये) मी ‘मार्गशीर्ष’ मास आहे.
श्रावण मासातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते.
‘चंद्रवर्षानुसार हिंदु वर्षाच्या पाचव्या मासाला ‘श्रावण मास’, असे म्हणतात. हा मास भगवान शिवाला विशेष प्रिय आहे. त्यामुळे या मासात आशुतोष भगवान सांबसदाशिवाची पूजा-अर्चा यांचे विशेष महत्त्व आहे.
वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.
महाराष्ट्रातील कान्हादेशमध्ये (खान्देश) अक्षय्य तृतीयेच्या सणाला ‘आखजी’ म्हणून संबोधले जाते. येथे आखजी हा सण दीपावली एवढाच महत्त्वाचा गणला जातो.
वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा मनुष्य सगळ्या पापांतून मुक्त होतो’, असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे.
सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञताभाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात.