अशांनाही कारागृहात डांबा !

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे हा त्यांचा विरोध करण्याचा एक प्रकार आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केले.

हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !

तेलंगाणा राज्यातील धर्मादाय विभागाने त्याच्या वारंगळ येथील ३ मजली कार्यालयाच्या बांधकामासाठी ३ मंदिरांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे.

आता पी.एफ्.आय.वर बंदीही घाला !

एन्.आय.ए. आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी १२ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ठिकाणांवर धाडी घालून १०६ जणांना अटक केली. जिहादी आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या.

हिंदू हे ऐकतील का ?

‘हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील. हिंदूनी संघटित होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी जयपूर येथे केले.

खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

भारतापासून वेगळ्या खलिस्तानच्या निर्मितीसाठी कॅनडातील टोरंटोमधील खलिस्तानवाद्यांनी जनमत संग्रह घेतल्याचा दावा केला आहे. यासाठी १ लाख १० सहस्र लोकांनी मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रिटनमधील धर्मांधांमुळे तेथील हिंदू असुरक्षित !

ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केले. लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या मुसलमानांनी हिंदूंच्या एका मंदिरावरील भगवा ध्वज काढून तो जाळला.

इस्लामी देशात होणारा हिजाबचा विरोध जाणा !

हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी हिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमधील महिलांनी हिजाब हटवून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.

‘ॲमेझॉन इंडिया’चे खरे स्वरूप जाणा !

राष्ट्रीय बाल संरक्षण आणि अधिकार आयोगाने ‘ॲमेझॉन इंडिया’ आस्थापनाला धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

भारत स्वतःला हिंदु राष्ट्र कधी घोषित करणार ?

‘ज्या दिवशी भारत स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करील त्यानंतर काही काळातच १४-१५ देशही स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील !’ – पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती