स्वच्छतागृह ठेकेदारांची ‘दादागिरी’ का ?
राज्यातील महिलांच्या सन्मानार्थ एस्.टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. त्यामुळे बसस्थानकांवर महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र या परिस्थितीचा अपलाभ काही ठिकाणी घेतला जात आहे.
राज्यातील महिलांच्या सन्मानार्थ एस्.टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. त्यामुळे बसस्थानकांवर महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र या परिस्थितीचा अपलाभ काही ठिकाणी घेतला जात आहे.
जळगाव जिल्ह्यासह राज्यात अवेळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अवेळी पावसासह वादळी वारे आणि गारपीट यांमुळे शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे.
फक्त ‘बेस्ट’च नाही, तर शासनाचे सर्व उपक्रम आणि कार्यालये यांमध्ये ‘भ्रमणभाष’ वापराच्या संबंधित नियमावली लागू करणे आवश्यक झाले आहे. यामधून सर्वांचा अमूल्य वेळ तर वाचेल आणि स्वयंशिस्तही लागेल.
कात्रज-देहूरोड (पुणे) बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रस्त्यावर वादळी वार्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. अचानक सोसायट्याचा वारा आल्याने किवळे येथे एका बांधकाम साईटवर काम करणारे कामगार एका पंक्चरच्या दुकानामध्ये आडोशाला थांबले होते.
एका मराठी अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या वैयक्तिक क्षणांविषयी केलेले एक विधान चांगलेच गाजत आहे. ‘त्यांचे वैयक्तिक क्षण आम्ही पाहिलेले आहेत’, असे तिने म्हटले. खरेतर कुणीही आपल्या आई-वडिलांच्या संदर्भात अशा विषयांवर उघडपणे वाच्यता करत नाही. याला कारण ‘संस्कृती’ आणि ‘नैतिकता’ आहे.
तापमान वाढीला ‘आधुनिक जीवनशैली’ कारणीभूत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यात लक्ष घालून समाजाचे प्रबोधन करणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मानवाची विनाशाकडे वाटचाल होईल हे नक्की !
लोकांची कारणे भली वेगवेगळी असतील; पण शेवटी भीक मागायची ही नवीनच पद्धत चालू झाली आहे आणि देशासाठी घातक आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
उद्योग, व्यवसाय, रोजगार यांसह घरगुती वापरासाठी पाणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये ४ किंवा ५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.
आफ्रिकेत आढळणार्या ‘कॅथा इडूलिस काट’ या अमली पदार्थाच्या वनस्पतीपासून सिद्ध करण्यात आलेली दीड लाख रुपये मूल्याची पावडर पुणे येथील गुन्हे शाखेने पकडली आहे. गुन्हे शाखेने गेल्या ३ वर्षांत केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांच्या सेवनाचा वाढता कल लगेच लक्षात येतो.