कानपूर दंगलीचा बोध !

कट्टरतावाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी उत्तरप्रदेशप्रमाणे नीती अवलंबणे आवश्यक ! योगींच्या ‘बुलडोझर’ नीतीने आता कानपूर येथे दंगल घडवणार्‍या दंगलखोरांची घरेही पाडण्यात येतील. योगींच्या नीतीचे देशभर अनुकरण केल्यास सर्वच ठिकाणच्या दंगली नियंत्रणात येतील, हे निश्चित !

गांधीवादी नव्हे, प्रखर राष्ट्रवादी !

भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !

सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पर्व !

जनतेची शुद्ध सात्त्विक दृष्टी ही भारताची वास्तविक शक्ती बनू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. स्थूलातून मंदिरे उभारली, तरी त्यांवरील आक्रमणाचा धोका संभवतो; पण ‘हिंदु’मन पालटले, तर पृथ्वीतलावर त्याहून सामर्थ्यवान काय असेल ? त्यामुळे हिंदूंनो, तुमच्या नसानसांत संस्कृती भिनवण्यासाठी साधना करा आणि राष्ट्राचे हात बळकट करा !

भारतद्वेषी तुर्कस्तान !

तुर्कस्तानची ही भारतद्वेषी वळवळ लक्षात घेता भारत सरकारने आता त्याच्या संदर्भात कठोर धोरणच अवलंबायला हवे. भारताला वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करणाऱ्या तुर्कस्तानला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे. तसे केल्यासच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत मुत्सद्दी म्हणून ओळखला जाईल !

हिंदूंचा वंशविच्छेद चालूच !

फुटकळ आतंकवादी अण्वस्त्रधारी देशाला भारी पडत असतील, तर हे चित्र सरकारला अत्यंत लज्जास्पद आहे. हा आतंकवाद आपण अजून कधीपर्यंत चालू देणार आहोत ? आणखी किती निरपराध हिंदूंच्या हत्या होऊ देणार आहोत ? हे सरकारला ठरवावे लागेल आणि सरकार तसे करत नसेल, तर हिंदूंनी त्यांना तसे करण्यास भाग पाडावे. ती तरी लोकशाही ठरेल !

धर्म : गोळी कि चैतन्याचे बीज ?

‘धर्म अफूची गोळी आहे कि चैतन्याचे बीज ?’, हे येत्या काळात संपूर्ण विश्वाला लक्षात येईल !

पाकिस्तानात चालते व्हा !

हिंदूंनाच या देशातून ‘चालते व्हा’ म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी आणि हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. असे केल्याने हिंदूंनाच ‘तालिबानी’ म्हटले जाणार आणि खऱ्या तालिबानी विचारांच्या लोकांना कुरवाळले जाणार, हेही तितकेच खरे ! तरीही हिंदूंनी आता याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वैध मार्गाने कृतीला प्रारंभ केला पाहिजे !

धर्मांतरविरोधी कायदा हवाच !

धर्मांतर रोखण्यासाठी प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांचा मार खाणे, कारागृहात जाणे अशा दिव्यांना सामोरे जावे लागते. तरीही धर्मांतर रोखण्याचे कार्य ते इमानेइतबारे करतात.

ममता बॅनर्जी यांची हुकूमशाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलर आहेत’, अशी ओरड करणारे साम्यवादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयावर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळवून गप्प आहेत ! ममता बॅनर्जी यांचा हा निर्णय एकप्रकारे शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ करणारा निर्णय आहे, असेच म्हणावे लागेल !