दैनिक ‘सनातन प्रभात’ची चातकाप्रमाणे वाट पहाणारे वाचक !

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आमचे आत्मबळ आहे. ‘उद्या दैनिकात काय वाचायला मिळेल ?’, याची मी चातकाप्रमाणे वाट पहात असते. यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. शीतल शशिकांत दाभोलकर, नेरुल, पणजी, गोवा.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सण-उत्सव यांविषयीची माहिती शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांना सांगणारे श्री. संतोष वर्तक !

‘‘हे दैनिक राष्ट्र, धर्म, देवता यांविषयीच्या माहितीचे ज्ञानभांडार आहे. यातील वृत्ते वस्तूनिष्ठ असतात. अभ्यासक्रमात शिकवले न जाणारे राष्ट्र-धर्म विषयीचे मार्गदर्शन यातून मिळते. आजच्या पिढीत राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम जागृतीचे कार्य दैनिक करत आहे.’’

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे दैनिकाविषयीचे अभिप्राय !

तेजस्वी विचारांमधून अध्यात्माच्या संदर्भात असणार्‍या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते ! – विनोद सत्यनारायण ओझा, इचलकरंजी, कोल्हापूर मी प.पू. भक्तराज महाराज यांची प्रासादिक शिकवण, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी विचार यांचे नियमित वाचन करतो. प्रत्येक विचारात आणि शिकवणीत अध्यात्माच्या संदर्भात असणार्‍या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घराघरात पोचायला हवे … Read more

हिंदूंनो, आंतरिक दिवाळी साजरी करूया !

आंतरिक दिवाळी म्हणजे मनमंदिरातील दिवाळी ! मनमंदिरात ज्ञानाचे दीप लावणे आणि स्वतःचे नरकासुररुपी दोष अन् रावणरुपी अहं घालवणे, भावाच्या रांगोळ्या घालणे, प्रीतीची मिठाई वाटणे, सर्व देवतांना आपल्या हृदयसिंहासनावर स्थापन करणे, भक्तीचे कंदील लावणे, मन आनंदी आणि निर्मळ ठेवणे, म्हणजेच आंतरिक दिवाळी !

‘मी केले’, ‘मी विनामूल्य देतो’, असे निर्मात्याने कधी म्हटले आहे का ?

अध्यात्माची शिकवण ज्याने घेतली, तोच खरा ज्ञानी ! हे ब्रह्मांड, हे विश्व, हे त्या परमेश्वराची निर्मिती आहे. तो मालक आहे. तो सर्वांनाच सर्व काही म्हणजेच हवा, पाणी, अन्न विनामूल्य देत आहे, तरीपण तो परमात्मा ‘मी केले’, असे कधीही म्हणत नाही.

‘सनातन प्रभात’ हे केवळ ‘दैनिक’ नाही, तर एक ‘सैनिक’ आहे.

‘सनातन प्रभात’ हे केवळ ‘दैनिक’ नाही, तर एक ‘सैनिक’ आहे.’ खरोखर आज मला त्याची प्रचीती येत आहे. जेव्हा मी माझ्या उशीखाली दैनिक ठेवून झोपते, तेव्हा ते माझे वाईट स्वप्नांपासून रक्षण करते.’

धर्मांधांच्या आतंकवादी कृत्यांकडे हिंदूंनी बारकाईने लक्ष ठेवायला हवे !

‘मराठवाड्याचे आतंकवादी कनेक्शन’ या शीर्षकाखाली बीडच्या इरफान शेख याच्या अटकेसंबंधीचे एक वृत्त प्रसारमाध्यमांनी नुकतेच दाखवले. मराठवाड्यातील असे जे धर्मांध तरुण आतंकवादी कृत्यांसंबंधी सापडत आहेत…

हिदूंनो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आदर्श घ्या !

या श्‍लोकाप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व शिवपाईक धारकरी दैनंदिन जीवनात जगतात, तसेच देव, देश आणि धर्म यांचे कार्य करतात. फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या हा कालावधी महाराष्ट्र्रातील प्रत्येक धारकरी, शिवपाईक हे धर्मवीर बलीदान मास म्हणून पाळतात.

घराणेशाहीची कीड

‘आजकाल राजकारणात ‘घराणेशाही’ वाढतच चालली आहे. गल्ली ते देहली घराणेशाहीला ऊत आला आहे. यामध्ये सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. कुणीही एकमेकांकडे बोट दाखवण्याची आवश्यकता नाही. घराणेशाहीमुळे लोकशाहीची गळचेपी होत आहे

याला मीच उत्तरदायी !

भ्रष्टाचार, महागाई वगैरे वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत.आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ?