वाई (जिल्हा सातारा) येथील पोलिसांनी दुकाने फोडणार्‍या चोरांची गावातून काढली धिंड !

गणपती आळी येथे असणारी काही दुकाने चोरांनी कटावणीच्या साहाय्याने फोडून ५२ सहस्र ३०० रुपये चोरून नेले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत दरोडेखोरांना अटक केली आणि वाई शहरातून त्यांची धिंड काढली.

विवाह सोहळ्याला १ सहस्र ५०० लोकांची गर्दी केल्याप्रकरणी हिंगोली येथील मंगल कार्यालयावर गुन्हा नोंद

साई मंगल कार्यालयात झालेल्या विवाह सोहळ्याला १ सहस्र ५०० लोकांनी गर्दी केल्याने मंगल कार्यालयाच्या मालकावर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

समलैंगिक विवाह हा मूलभूत अधिकार नसल्याने त्याला मान्यता देऊ नये ! – केंद्र सरकारची देहली उच्च न्यायालयात मागणी

भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार समलैंगिक विवाह हा अपराध मानण्यात येत होता. त्यासाठी १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती; मात्र ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात समलैंगिक विवाह हा अपराध नसल्याचे सांगितले होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान सहन केला जाऊ शकत नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

हिंदूंच्या देवतांच्या अवमानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवरही आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे !

बळाच्या नव्हे, तर हिंदु धर्माच्या आधारे ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सनातन धर्म मानवता आणि संपूर्ण जगाचा धर्म आहे अन् सध्या त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हटले जाते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या आधारे जगामध्ये पुन्हा आंनद आणि शांतता निर्माण करता येऊ शकते.

(म्हणे) ‘भ्रष्टाचार हा कार्यपद्धतीचा भाग !’ – हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक

अशा भ्रष्ट पोलीस प्रशासनामुळेच आजवर लक्षावधी लोक न्यायापासून वंचित राहिले, सहस्रो हिंदूंवर अन्याय झाले, शेकडो गुन्हेगार मोकाट सुटले आणि कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असेच कुणालाही वाटेल !

आमच्याशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडू नये !

निधर्मी भारतात चर्चची ही धार्मिक दादागिरी केरळमधील ढोंगी निधर्मीवादी साम्यवाद्यांना आणि देशातील तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना चालते का ? अशी चेतावणी हिंदूंच्या संतांनी किंवा धर्मपीठाने दिली असती, तर यांनीच आकाशपाताळ एक केले असते !

पाक ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या करड्या (ग्रे) सूचीमध्ये कायम !

पाकचे जिहादी आतंकवाद्यांना मिळणारे साहाय्य पहाता त्याला काळ्या सूचीत घालणेच योग्य ठरणार आहे !

कानपूर येथे मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे स्वाक्षरी अभियान !

अशा प्रकारांमध्ये राष्ट्रपती नव्हे, तर राज्य सरकारला अधिकार असल्याने या अभियानाची योग्य फलनिष्पत्ती मिळण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी राज्य सरकारकडे याविषयी मागणी लावून धरणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी !’ – मुक्ता दाभोलकर

सद्यःस्थितीत पुरोगामी विचारांनी कार्य करणार्‍या संघटना सत्तेपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे पुरागामी विचारांचे सरकार निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे शोषित अन् वंचित यांसाठी कार्य करणार्‍या सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.