अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा विरोध नेहमीच करू ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

पडद्यावर हिरो असलेले अभिनेते खर्‍या आयुष्यात कसे झिरो आहेत, हे दाखवण्यासाठी आम्ही अभिनेते अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांचा लोकशाही पद्धतीने नेहमीच विरोध करू.

पोलीस असल्याचे खोटे सांगत ५ सहस्र रुपयांची फसवणूक !

पोलीस असल्याचे खोटे सांगून ट्रकची झडती घेत ५ सहस्र रुपये लुटल्याची तक्रार शिरवळ (जिल्हा सातारा) पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. गुन्हेगारांना  पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण !

मुंबईतील हॉटेलमध्ये खासदार मोहनभाई देलकर यांचा मृतदेह आढळला !

या प्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी गुजराथी भाषेत लिहिलेली चिठ्ठी येथे आढळली आहे. यात मोठ्या लोकांची नावे आली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी नेटकर्‍यांमध्ये लोकप्रिय असणार्‍या समीर गायकवाडची पुण्यातील रहात्या घरात आत्महत्या

साधनेमुळे आत्मबळ वाढून ताणतणाव, संघर्ष, नकारात्मकता, तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाते येते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आत्महत्यांचे प्रमाण पहाता समाजाला साधना शिकवणे किती अपरिहार्य आहे, हे मनावर बिंबवणारी घटना !

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिवक्त्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !

अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे.

पुणे येथील भूमी खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक !

जीवे मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धमकी देऊन जमीन खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या सागर दत्तात्रय फडतरे आणि गणेश दत्तात्रय फडतरे या दोघांना अमली पदार्थ अन् खंडणीविरोधी पथकाने..

नागपूर येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी सुरक्षिततेच्या कारणास्तव इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी दिली.

सहस्रो लोक विनामास्क फिरत असतील, तर दळणवळण बंदी टाळताच येणार नाही ! – आयुक्त इक्बालसिंह चहल 

मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

शिवसेनेचे ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (वय ६६ वर्षे) यांचे २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मागील दोन मासांपासून उपचार चालू होते.

पिंपरी (पुणे) येथे घरगुती गॅसची चोरी करणार्‍या टोळीला अटक, ३८१ सिलिंडर जप्त

पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅसची चोरी करणार्‍या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी कारवाईमध्ये एकूण ३८१ गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या..