अर्धा इंच जागाही कर्नाटकला देणार नाही !

सरकार सीमाभागातील ३६५ गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बोम्मई यांच्या उद्दाम वागण्यामुळे मराठी माणसाचे रक्त सळसळले आहे.

राज्यात लवकरच मेडिकल बोर्डच्या माध्यमातून ४ सहस्र ५०० जागा भरणार ! – गिरीश महाजन, आरोग्यमंत्री

भरतीमध्ये आधुनिक वैद्यांची ३०० पदे भरली जाणार आहेत. ‘एम्.पी.एस्.सी.’मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार ‘मेडिकल बोर्ड’ सिद्ध करणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंत इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डशी लिंक करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राज्यातील एकूण ५ लाख १३ सहस्र १६३ विद्यार्थ्यांता आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. आधारकार्डशी लिंक केल्यामुळे विद्यार्थ्यांची २ वेळा नावे येणार नाहीत.

स्वमग्न मुलांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र चालू करणार ! – डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री

प्रत्येक तालुक्यात पथके नियुक्त केली असून त्यांच्या वतीने स्वमग्नता आणि गतीमंदता या मेंदूविकारांविषयी विद्यार्थी अन् अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे वयांच्या बालकांची पडताळणी करण्यात आली आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात ३० सहस्र शिक्षकांची भरती करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

‘प्रत्येक विषयासाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. शिक्षकांच्या भरतीमुळे शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबेल’, असे केसरकर यांनी सांगितले. 

भविष्यात उच्चशिक्षण मातृभाषेत दिले जाईल ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

भविष्यात उच्चशिक्षणही मातृभाषेत दिले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. 

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंत मार्तंड पशुपती यांचा शिरच्छेद करण्याची धमकी

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना महंतांना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही. याप्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !

देशात पुन्हा मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्रशासन

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना अजून संपलेला नाही; पण भारत प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सिद्ध आहे. आम्ही सर्व संबंधितांना सतर्क रहाण्यास आणि दक्षता वाढवण्यास सांगितले आहे.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

दिग्रस येथील श्री. मल्लिकार्जुन मंदिर सभागृह येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी पेण येथे २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, जात-पात हे सर्व बाजूला सारून आता धर्मरक्षणासाठी एक हिंदू म्हणून या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.