‘स्पाइसजेट’च्या विमानात हवाई सुंदरीसमवेत गैरवर्तन
गैरवर्तन करणार्या व्यक्तीला आणि त्याच्यासमवेत असलेल्या अन्य एका प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. त्यांना विमातळाच्या सुरक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
गैरवर्तन करणार्या व्यक्तीला आणि त्याच्यासमवेत असलेल्या अन्य एका प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. त्यांना विमातळाच्या सुरक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
‘बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्याविरुद्ध बोलणे थांबवले नाही, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर करू’, अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांना २३ जानेवारी या दिवशी दूरभाषद्वारे देण्यात आली आहे.
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?
या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.
जेव्हा व्यवस्था किंवा त्याचे ठेकेदार हे लोकांना घाबरतात, याचा अर्थ तेथे स्वातंत्र्य असते; मात्र जेव्हा लोक व्यवस्था आणि त्याचे ठेकेदार यांना घाबरतात, तेव्हा मात्र तेथे दडपशाही चालू असते, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाने केले.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन ! ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन’, अशी घोषणा येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या रायपूर येथील दरबारमध्ये केली.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (ओ.एस्., भ्रमणभाष प्रणाली) ‘भरोस’चे परीक्षण केले. ही प्रणाली आयआयटी मद्रासने विकसित केली आहे.
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समर्थन !
राज्यातील मुरैना जिल्ह्यातील अंबाह क्षेत्राच्या अंतर्गत येणार्या खडियाहार येथे वास्तव्य करणार्या सलीम खान नामक एका वृद्ध व्यक्तीने हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांचे ‘बाबा सुखराम दास’ असे नामकरण करण्यात आले.
हा जत्रोत्सव चालू होण्याच्या आधी विश्व हिंदु परिषदेने मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याची मोहीम हाती घेऊन त्या अनुषंगाने जागोजागी भित्तीपत्रके लावली होती.