उत्तरप्रदेशात पोलीस अधिकार्‍याला बंदुकीत गोळी कुठून घालायची, हेच ठाऊक नाही !

असे अधिकारी पोलीसदलात भरती कसे झाले ? ‘अशांना प्रशिक्षण देतांना ते काय करत होते ?’, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे ! असे पोलीस जनतेचे रक्षण कधीतरी करू शकतील का ?

जयपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेचा विनयभंग : आरोपीला जाब विचारताच हिंसाचार

जयपूरमधील कृष्णा कॉलनीमध्ये धर्मांधाने एका हिंदु महिलेचा विनयभंग केल्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.  

सौदी अरेबियाकडून पाकमधील त्याच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचा सल्ला !

आता या देशांसह संपूर्ण जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसे केल्यास पाकवर संपूर्ण बहिष्कार घातला जाईल आणि मग त्यांची कोंडी होऊन तो ताळ्यावर येतो का, हे पहाता येईल !

बाडमेर (राजस्थान) येथे दलित महिलेवर बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या गफ्फार खान याला अटक

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे आता कुठे आहेत ?

मैसुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांकडून चर्चमध्ये तोडफोड  

मैसुरू (कर्नाटक) येथील पेरियापटना भागातील सेंट मेरी चर्चमध्ये २७ डिसेंबरला अज्ञातांनी तोडफोड केली. सायंकाळच्या वेळी ही घटना घडली.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

जोपर्यंत आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही !

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते.

अकोल्यातील जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार ! – उदय सामंत, मंत्री

अकोला शहरातील जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निधीची न्यूनता भासणार नाही. या कामांच्या देयकांमध्ये तफावत दिसून येत आहे. कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल.

काँग्रेसच्या दुटप्पी धोरणामुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न गेली ६६ वर्षे प्रलंबित ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या प्रश्नामुळे कधीही घराबाहेर न पडणारे रस्त्यावर आले आणि रस्त्यावरून पायरीवर आले ! राज्याच्या विरोधात ठराव करण्याची वृत्ती हे कशाचे द्योतक आहे ?

धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांना साहाय्य केल्याप्रकरणी नाशिकमधील पोलीस अधिकार्‍यांची होणार चौकशी !

अशा समाजद्रोही अधिकार्‍यांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? स्थानांतरित ठिकाणीही हे पोलीस हेच गुन्हे करणार नाहीत का ? अशांचे त्वरित निलंबन करायला हवे ! तसेच त्यांचा कार्यकाळ का वाढवला गेला ?, याचीही चौकशी व्हायला पाहिजे !