केरळमध्ये दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

येथे दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका ३५ वर्षीय व्यसनी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. इतर वेळी हा तरुण प्रतिदिन २ ते ३ वेळा मद्य पिण्यासाठी जात होता; मात्र दळणवळण बंदी झाल्यानंतर त्याला मद्य न मिळाल्याने तो त्रस्त झाला होता.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एम्.आय.एम्.चे जिल्हाध्यक्ष मंसूर आलम यांना अटक

सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी एम्.आय.एम्.चे प्रयागराज जिल्हाध्यक्ष मंसूर आलम यांना पोलिसांनी अटक केली. मंसूर हे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जवळचे समजले जातात. मंसूर यांनी ‘फेसबूक’वर केलेल्या ‘पोस्ट’मध्ये लिहिले होते…

इचलकरंजी येथे नमाजपठणासाठी जमलेल्यांवर कारवाई करणार्‍या पोलिसांवर धर्मांधांची दगडफेक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असतांनाही गावभाग परिसरातील एका प्रार्थनास्थळात ७० हून अधिक धर्मांधांच्या उपस्थितीत नमाजपठण चालू होते. ही माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आणि प्रभारी निरीक्षक यांनी या ठिकाणी जमलेल्या सर्वांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला.

बेळगाव येथे दळणवळण बंदीच्या वेळी मशिदीत नमाजासाठी गेलेल्यांना पोलिसांकडून चोप !

येथे दळणवळण बंदी असतांनाही त्याचे उल्लंघन करत अनेक लोक नमाजसाठी मशिदीत गेले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडणार्‍या लोकांना चांगलेच चोपले. दळणवळण बंदी असल्यामुळे मशिदींमध्ये जाण्यास बंदी असतानाही धर्मांध तेथे जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकांनी दिले एक दिवसाचे वेतन !

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य म्हणून प्रत्येक जण पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) सैनिकांनीही स्वेच्छेने त्यांचे एक दिवसाचे वेतन दिले आहे.

दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे. या बंदीचे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार दळवळण बंदीच्या निर्बंधांचे पालन न करणार्‍यांवर प्रशासन भा.दं.वि. कलम १८८ नुसार कारवाई करू शकते.

दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका २८ मार्चपासून पुन्हा प्रसारित करणार ! – केंद्र सरकार

दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

दळणवळण बंदी असतांनाही तेलंगण येथे चारचाकीतून फिरणार्‍या तरुणाला अटक

येथील पोलिसांनी दळणवळण बंदी असतांनाही चारचाकी वाहनातून फिरणार्‍या एका २० वर्षीय तरुणाला अटक करून त्याला विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. ‘हा तरुण खोकत असल्याचे आढळून आल्याने त्याला या केंद्रात पाठवण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

दळणवळण बंदीमुळे रत्नागिरीत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत काही लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. याला आळा घलण्यासाठी रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे

झारखंड आणि तमिळनाडू येथील मशिदींमध्ये विदेशी मौलवी सापडले !

भारतातील बर्‍याच मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालतात, असा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. त्याच वेळी अशांवर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती. अशा मशिदी आणि मौलवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने कृती करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !