अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीविषयी दक्ष रहावे.

गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांना सतत विशेष सुरक्षाव्यवस्था द्यावी !

हिंदु सकल समाजाची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी -मणीपूर आणि देशभरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात ठोस कारवाई करा !  

#Exclusive : ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे केंद्र राज्याबाहेर जाऊ न देता कोकणातच रहाणार !

‘‘रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत आपत्तीचा फटका बसतो. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रात दुर्घटना घडतात. त्यामुळे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे पथक रायगड येथेच स्थापन व्हावे, यासाठी राज्यशासन या प्रकरणात लक्ष घालेल.’’

आमदारांना असमान निधीवाटप करणे, हा जनतेवर अन्याय ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत एकाही विरोधी पक्षातील आमदारांना वाढीव निधी दिला नाही. त्यांनीच हा पायंडा पाडला.

सेवाभावी वृत्तीने चालणार्‍या वास्तूंच्या व्यायसायिक भाड्यात सरकार कपात करणार !

लोकप्रतिनिधींच्या निधीतून बांधण्यात येणार्‍या व्यायायशाळा, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक संघ आदी वास्तू सेवाभावी वृत्तीने चालवल्या जातात. त्यांना व्यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते.

डॉ. तात्याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्यागपत्र दिल्याचा आरोप सरकारने फेटाळला !

डॉ. लहाने यांनी तडकाफडकी दिलेल्या त्यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलै या दिवशी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यात गेले ४ दिवस पावसाची संततधार चालूच आहे, तसेच वादळी वारेही वहात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यवतमाळ जिल्‍ह्यात पावसाचे तांडव !

जिल्‍ह्यात ६ दिवसांपासून चालू असलेली पावसाची रिपरिप २० जुलैपासून जोराच्‍या पावसात रूपांतरित झाली. २१ जुलैच्‍या रात्री जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्‍ये मोठा पाऊस येऊन अनेक तालुक्‍यात अतीवृष्‍टी झाली; मात्र यवतमाळ शहरात ३०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. लहान मोठ्या सर्व नद्या, नाले तुडुंब भरले असून सहस्रो हेक्‍टरवरील पिके पाण्‍यात बुडाली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ‘सेवा दिवस’ साजरा !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष संदीप नाईक यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि त्‍यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीमध्‍ये नवी मुंबई भाजपच्‍या वतीने सर्वत्र सेवा दिवस साजरा करण्‍यात आला.

अमरावती येथे ‘कलश जागृती यात्रे’त सनातनचा सहभाग

या कलश यात्रेचा उद्देश ‘घराघरात यज्ञ व्‍हावे, गोमातेला राष्‍ट्रमाता म्‍हणून घोषित करण्‍यात यावे आणि ‘संस्‍कृत भाषा हीच आपली संस्‍कृती आहे’ याचा प्रचार करणे हा आहे’, असे आयोजक श्री. प्रकाश सिरवानी यांनी या वेळी सांगितले.