पोखरापूर (जिल्हा सोलापूर) येथील जगदंबादेवीचे पुरातन मंदिर भुईसपाट !

विकासासाठी मंदिरे पाडणारा पुरातत्व विभाग आणि प्रशासन कधी या कारणासाठी रातोरात मशिदी पाडण्याचे धाडस दाखवणार का ?

अरण्येश्‍वर (पुणे) भागात घरात असलेल्या काळूबाई मंदिरात दागिने आणि पैसे यांची चोरी !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे दुर्दैवी !

प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ या वर्षीही १०० टक्के यशस्वी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सलग २१ वर्षे धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येत आहे. रासायनिक रंग खेळून खडकवासला धरणात उतरणार्‍या नागरिकांचे मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्याचे हे अभियान या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले.

सिंधुदुर्ग : असलदे येथे २ मंदिरांत चोरी,  तर शाळेत चोरीचा प्रयत्न

येथील श्री रामेश्वर मंदिर आणि डामरेवाडी  येथील श्री साईमंदिर येथील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली, तसेच गावठाण, असलदे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीतील कपाट तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला.

सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.

सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद 

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

सोलापूर येथे कांदा प्रश्नावर जनहित संघटनेचे पालकमंत्र्यांसमोर आंदोलन !

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत येथील जिल्हा नियोजन भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला; मात्र विखे पाटील हे निवेदन न स्वीकारता गेले.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ कोटी ४१ लाखांची अफूची बोंडे जप्त !

एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची शेती होणे धोकादायक आहे. प्रशासनाने असे न होण्यासाठी प्रयत्न करावेत !

मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून या मार्गाच्या पहाणी दौर्‍यानंतर मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्‍या सूचीत वडापाव १३ व्‍या स्‍थानी !  

येथील रस्‍त्‍यारस्‍त्‍यांवर मिळणार्‍या वडापावला जागतिक मान्‍यता मिळाली आहे. जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्‍या सूचीत वडापावला १३ व्‍या क्रमांकावर स्‍थान मिळाले आहे. ‘टेस्‍ट अ‍ॅटलस’ या ‘जागतिक फूड ट्रॅव्‍हल गाईड’ने हे सर्वेक्षण केले आहे.