भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्ये मतदान करू ! – अजित सिंह बग्गा, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापार मंडल आणि अध्यक्ष, वाराणसी व्यापार मंडल

औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्म्य पत्करूनही पुनर्स्थापित केल्याविना आम्ही रहाणार नाही.

‘हेट स्पीच’चा बडगा धर्मांध आणि जिहादचे आवाहन करणार्‍या पुस्तकांवर कधी उगारणार !

‘हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्‍या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा गौरव !

श्री अंजनेश्वर मंदिराचे महंत पू. विद्यादास महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा मारुतीरायांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते.

ईश्वराप्रती भाव असणारे आणि निरपेक्षपणे धर्मकार्य करणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याविषयी झालेला सूक्ष्मातील प्रयोग !

भजने ऐकतांना त्यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्वत: व्यय करून विविध गावांमध्ये जाऊन हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. त्यांचे कार्य निरपेक्ष असते.

हिंदूंची सर्व मंदिरे परत मिळवणे, हा आमचा प्रण आहे ! – अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

महाराणा प्रताप, शिख धर्मगुरु यांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान केले; पण पराभव स्वीकारला नाही. आपल्याला त्यांच्याहून अधिक संघर्ष करून हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. तरच त्या धर्मयोद्ध्यांना शांती मिळेल.

‘हलालमुक्त भारत’ सत्यात उतरवण्यासाठी जागृती अभियान राबवूया ! – प्रशांत संबरगी, बेंगळुरू, कर्नाटक

हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल’विषयी जागृती करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. ‘हलाल’पासून मुक्ती मिळवण्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेत ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे.

बौद्धिक युद्ध लढण्यासाठी आचार्य चाणक्य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्यक ! – संतोष केंचम्बा, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र धर्म संघटन

देशात खोटी कथानके (नॅरेटिव्ह्स) रचून ती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे.

साधनेच्या बळावर समाजातील नकारात्मकतेशी लढून हिंदु राष्ट्र आणू शकतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात.त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.

नक्षलवादी हेच साम्यवादी आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत, हे न सांगणे, हाच वैचारिक आतंकवाद ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्‍न कुणी विचारेल का ?