ट्विटरवरून टिक-टॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी

ट्विटरवरून #BanTikTok हा हॅशटॅग १८ मे या दिवशी राष्ट्रीय ट्रेंडमध्ये शीर्षस्थानी होता. कथित टिक-टॉक स्टार फैजल सिद्धीकी याने यावर एक व्हिडिओ प्रसारित करून तरुणींवर आम्ल फेकण्याच्या कृत्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यास लोकांनी विरोध केला.

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

कोरोनामुळे आता अधिवक्त्यांना काळा कोट घालणे बंधनकारक नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा काही कालावधीसाठी निर्णय

मुळात काळा कोट, झगा आणि टाय वापरणे ही इंग्रजांची गुलामगिरी आहे. ती भारतात आतापर्यंत टाकून देणे अपेक्षित होते, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

 देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ सहस्र ९७२, मृतांची संख्या ७५

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे,

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारत सिद्ध करणार ‘हजमत सूट’ !

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि…

देशात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण

देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील सर्व नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘देशातील सर्व वर्गातील नागरिकांनी ‘पी.एम्.-केअर्स’मध्ये (पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये) निधी जमा करावा.

विदेशांतून आलेल्या सर्वांची पडताळणी झालीच नाही ! – मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा

गेल्या २ मासांत विदेशांतून १५ लाख नागरिक भारतात आले; पण सर्वांची कोरोनाची पडताळणी झालेली नाही. कोरोनाची पडताळणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांची संख्या यांत मोठी तफावत आहे, अशी माहिती मंत्रीमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गऊबा यांनी दिली.

भारतात आतापर्यंत ९३३ जणांना कोरोनाची लागण, तर २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९३३ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !

कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे.