देशात सर्वत्र ७२ वा प्रजासत्ताकदिन साजरा

देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले.

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !

देहलीतील आजच्या ट्रॅक्टर मोर्च्यात गोंधळ घालण्यासाठी ३०८ पाकिस्तानी ट्विटर खाती कार्यरत ! – देहली पोलिसांचा दावा

उद्या २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यावर नियंत्रण ठेवून गोंधळ घालण्यासाठी पाकमधील ३०८ ट्विटर खाती कार्यरत असल्याची माहिती देहली पोलिसांना मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसह उत्तर भारतात शीतलहर

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत शीतलहर आल्याचे दिसून येत आहे. येथे बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हिमाचल प्रदेशात कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला.

पत्नीच्या बँक खात्यांचा तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही ! – केंद्रीय माहिती आयोग

केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले की, एखाद्याने प्राप्तीकर विवरणपत्र भरणे ही सार्वजनिक गोष्ट होऊ शकत नाही. नागरिकाने कर भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा उद्देश नसेल, तर अशी माहिती अर्जदाराला देता येणार नाही.

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली.

राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?

शेतकर्‍यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देण्यास सांगितले !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !

चीनकडून भारताच्या विश्वासाला तडा ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

भारत पुनःपुन्हा त्याच्यावर विश्‍वास कसा ठेवू शकतो ? ‘चीनवर विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात असून त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे’, असेच भारतियांना शासनकर्त्यांकडून अपेक्षित आहे !

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !