कुणाचीही खासगी संपत्ती विनाभरपाई अधिग्रहित करणे मानवाधिकारविरोधी ! – सर्वोच्च न्यायालय

कुणाचीही ‘खासगी संपत्ती विनाभरपाई अधिग्रहित करणे’ त्याच्या मानवाधिकार आणि राज्यघटनेच्या कलम ‘३०० ए’ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

हिजाब प्रकरणातील विद्यार्थिनी मुस्कान खान हिचे ‘अल् कायदा’चा प्रमुख अल् जवाहिरी याच्याकडून कौतुक

अल् जवाहिरी म्हणतो, ‘सामाजिक माध्यमांवर मुस्कानचा व्हिडिओ पाहून मी अगदी प्रभावित झालो आहे.

केवळ भारतातच ध्वनीक्षेपकावर अजान का ऐकायला मिळते ? – सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल

मी जगातील अनेक ठिकाणी फिरले आहे. आखाती देशांतही गेले आहे. तेथे ध्वनीक्षेपकावर बंदी आहे. मुसलमान देशांत ध्वनीक्षेपकावर अजान ऐकायला मिळत नाही. मग केवळ भारतातच ती का ऐकायला मिळते ?

भेदभाव आणि भ्रष्टाचार हे मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम ! – पंतप्रधान

काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यांनी प्राणवायुच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी दिली नाही ! – केंद्र सरकार

कोरोनाकाळात कोणत्याही राज्य सरकारने अथवा केंद्रशासित प्रदेशाने प्राणवायुच्या (ऑक्सिजनच्या) तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती अद्याप दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी ५ एप्रिल या दिवशी संसदेत प्रश्‍नोत्तराच्या सत्रात दिली.

गेल्या १५ दिवसांत पेट्रोल-डिझेल ९ रुपये २० पैशांंनी महागले !

पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ८० पैशांची वाढ झाली आहे. ५ एप्रिल या दिवशी झालेल्या वाढीमुळे देहलीत प्रतिलिटरमागे पेट्रोल  १०४.६१ रुपये झाले, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८७ रुपये झाला आहे. मुंबईत हेच दर अनुक्रमे ११९.६७ रुपये आणि १०३.२८ रुपये झाले.

दक्षिण देहलीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये मांस विक्रीची दुकाने बंद ठेवणार ! – महापौर मुकेश सूर्यन्

दक्षिण देहलीचे महापौर मुकेश सूर्यन् यांनी ‘चैत्र नवरात्रीमध्ये शहरात मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाची कठोरपणे कार्यवाही करणार’, असे म्हटले आहे. ‘आम्हाला आलेल्या तक्रारींनंतर आम्ही हा आदेश दिला आहे.

‘प्रसाद योजने’अंतर्गत सोलापुरातील प्राचीन मंदिरांचा समावेश करावा !

सोलापूर जिल्हा हा आध्यात्मिक तीर्थस्थळांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु अद्याप सोलापुरातील एकही प्राचीन मंदिराचा समावेश या योजनेत नाही. त्यामुळे प्राचीन मंदिराच्या विकासासाठी प्रसाद योजनेत समावेश करावा.

…तर हिंदूंना हातात शस्त्रे घ्यावी लागतील ! – यती नरसिंहानंद

जर भारतात मुसलमान पंतप्रधान झाला, तर पुढील २० वर्षांत ५० टक्के हिंदूंना धर्मांतर करावे लागेल. ४० टक्के हिंदू मारले जातील. हे घडू द्यायचे नसेल, तर आपल्याला पुरुषार्थ दाखवावा लागेल.

कथित पर्यावरणप्रेमी मेधा पाटकर यांच्या संस्थेला कोट्यवधी रुपयांची अवैध देणगी मिळण्याचे आरोप !

१७ वर्षे एखाद्या संस्थेचा अपव्यवहार उजेडात येऊ न शकणे अथवा समोर येऊ दिला न जाणे, हे गंभीर आहे ! यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी संस्थांच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !