
संकलक : श्री. विनायक दयानंद शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), कांचीपूरम्, तमिळनाडू. (१९.३.२०२५)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थापन केलेली ‘सनातन संस्था’ !
गुरुदेवांनी घालून दिलेला साधनेचा मार्ग म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करत ईश्वरप्राप्तीसाठी भक्ती करण्याचा मार्ग होय ! त्या मार्गावर जाणार्या सहस्रो साधकांचा समूह म्हणजे ‘सनातन संस्था’ होय ! ‘सनातन संस्था’ ही गुरुदेवांनी स्थापन केलेली केवळ एक नोंदणीकृत आध्यात्मिक संस्था नसून ती कलियुगातील अंधःकारात आणि जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये अडकलेल्या जिवांसाठी भगवंताने दाखवून दिलेली प्रकाशमय अन् ज्ञानमय वाट आहे.
‘सनातन संस्थेच्या वाटेवर चालतांना साधकांना आलेले दैवी अनुभव पुढील १ सहस्र वर्षे मानवजातीला दीपदर्शी होवोत आणि या सर्वांना कारणीभूत असलेले सनातन धर्माचे मूर्तीमंत रूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कीर्ती दाही दिशांमध्ये अविनाशी होवो’, ही श्रीमन्नारायणाच्या चरणी प्रार्थना आहे.’
सनातन धर्माचे मूर्तीमंत रूप असलेले आणि धर्मसंस्थापनेचे कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘ज्याप्रमाणे वेद अपौरुषेय आहेत, त्याप्रमाणे सनातन धर्मही अपौरुषेय आहे. अपौरुषेय असलेला सनातन धर्म प्राणीमात्रांचा अभ्युदय करत असतो. प्राणीमात्रांना ‘धर्म कसा आहे ?’, ते कळावे आणि त्याप्रमाणे अनुकरण करायला सोपे जावे; म्हणून ईश्वर सगुण रूपात पृथ्वीवर येतो. ईश्वर धर्मासाठीच पृथ्वीवर येतो. श्रीरामाचे वर्णन करतांना मारीच असुर रावणाला सांगतो, रामो विग्रहवान् धर्मः ।’ (वाल्मीकिरामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ३७, श्लोक १३) म्हणजे ‘श्रीराम हे धर्माचे मूर्तीमंत स्वरूप आहेत.’ म्हणजे श्रीराम स्वयं धर्माचे मूर्तीमंत रूप आहे. कलियुगात धर्माचे असे मूर्तीमंत रूप सापडणे अशक्य आहे. २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी दक्षिण भारतात भगवंताने ‘आद्य शंकराचार्य’ या रूपात येऊन धर्मसंस्थापनेचे कार्य केले. त्यानंतर सनातन धर्माचे मूर्तीमंत रूप म्हणून पृथ्वीवर धर्मसंस्थापनेचे कुणी कार्य केले असेल, तर ते म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले होय !
अहंकाराचे युग असलेल्या कलियुगात साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून घेणारे ‘धर्ममार्तंड सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’ !

कलियुग हे अहंकार आणि असत्य यांचे युग आहे. ‘वृषभ’ हे धर्माचे एक रूप असून ‘सत्य, तप, शौच आणि दया’, हे धर्माचे ४ स्तंभ आहेत, जे वृषभाचे पाय आहेत. धर्माच्या या ४ स्तंभांमध्ये केवळ ‘सत्य’ या एकाच स्तंभावर उभे असलेले युग, म्हणजे कलियुग ! ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, माया’ इत्यादी नाना विकारांनी भरलेले युग म्हणजे कलियुग ! या युगात विकार नसलेला मनुष्य सापडणे कठीण आहे. बाह्यांगाने विकार दिसत नसतात; कारण ते मायावी असतात आणि म्हणूनच कलियुगाला ‘मायावी युग’ असे संबोधले आहे. अशा या कलियुगात सध्याचे कलियुग हे घोर कलियुग आहे. अहंकाराच्या या युगात शुद्ध सत्त्वगुणी सत्ययुगाची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. असे असतांना ‘विकारांवर नियंत्रण मिळवून, तसेच विकारांना उफाळू न देता संयमित राष्ट्र आणि प्रजा सिद्ध करता येते’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जाणले. त्यांनी साधकांना माध्यम बनवून त्यांच्याकडून विकार आणि अहंकार यांच्या निर्मूलनासाठी अधिकाधिक प्रयत्न करवून घेतले. ‘विकारांनी भरलेल्या कलियुगातही संयमित, विकारनियंत्रित सत्ययुग आणता येते’, हे मानवजातीला ज्यांनी शिकवले आहे, ते धर्ममार्तंड म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले होय !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी धर्माचे सिद्धांत आणि गहन तत्त्व सर्वसामान्य मनुष्याला कळण्यासाठी वैज्ञानिक परिभाषेत ग्रंथ लिहिणे
मागील २००० वर्षांमध्ये मनुष्याला धर्माचे सिद्धांत आणि गहन तत्त्व हे सर्व संस्कृत भाषेतच उपलब्ध होते. १४ व्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि नंतरच्या काळात वारकरी संप्रदायातील संत, तसेच समर्थ रामदासस्वामी आदींनी मराठीत ते ज्ञान समाजाला सांगितले. सध्याच्या वैज्ञानिक युगात सर्वसामान्य मनुष्याला धर्माचे ज्ञान मिळणे अवघड होते. मागील २०० वर्षांत विज्ञानाचा उपयोग वाढला आणि मनुष्याला विज्ञानाची भाषा आवडायला लागली. ‘टक्केवारी, विषयांनुसार वर्गीकरण, वैज्ञानिक चाचणी, अनुभव आणि अनुभूती घेणार्यांचे प्रत्यक्ष प्रमाण’ इत्यादी मनुष्याला आवडायला लागले. सनातन धर्माचे सिद्धांत आणि ज्ञान सोपे न करता मनुष्याला कळेल, अशा परिभाषेत लिखाण करण्यासाठी फार मोठे धैर्य लागते. ‘धर्म, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म, साधनामार्ग, धर्माचरण, सण, उत्सव, व्रत, मंदिरे’ इत्यादी विषयांचे वर्गीकरण, पुनर्लेखन आणि प्रस्तुतीकरण करून नवीन ग्रंथांची रचना करण्याचे कार्य करण्यासाठी धर्मनारायणाचे एक रूपच असायला हवे. असे कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एप्रिल २०२५ पर्यंत ३६६ ग्रंथांचे संकलन केले आणि १३ भाषांमध्ये छापलेले १ कोटी ६१ सहस्रांहून अधिक ग्रंथ जगभर वितरित केले आहेत.
धर्मग्रंथांचा अभ्यास असलेले पंडित, आचार्य, स्थापित मठांचे मठाधिपती, विश्लेषक, वेदाध्ययन करणारे वेदमूर्ती आदी सर्वांच्या विचारांमध्ये विरोधाभास निर्माण न करता ‘धर्मशास्त्र उलगडून धर्मकार्याला पूरक होणारे लिखाण करणे’, हे गुरुदेव प.पू. डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्य आहे.
विरोधाला न जुमानता सूक्ष्मातील वाईट शक्तींचे अस्तित्व आणि त्यांचा मनुष्यावर होणारा प्रभाव निर्भयपणे जगासमोर आणणारे ‘धर्ममूर्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’ !
देवतांविषयी हिंदूंच्या मनात श्रद्धा आहे. देवतांचे अस्तित्व आहे आणि त्याचा लाभ मनुष्याला विविध प्रकारे होतो. याविषयीची चर्चा आणि विचारमंथन मागील अनेक शतके चालू आहे; मात्र देवतांसारखे बलाढ्य असलेले आणि धर्माला विरोध करणारे असुरही या जगात सूक्ष्मातून कार्य करतात. त्यांचे अस्तित्व मनुष्य जीवनाच्या प्रत्येक अंगावर प्रभाव पाडते. या विषयावर मंथन करायला किंवा त्याची साधी चर्चा करायलाही हिंदु समाज सिद्ध नव्हता, अशा वेळी भारताच्या पश्चिमेकडे एक धर्मसूर्य उगवला. त्या धर्मसूर्याचे नाव होते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.
‘जशा देवता सूक्ष्मरूपात आहेत, तशा वाईट शक्तीही सूक्ष्मरूपात आहेत’, हे जगाला दाखवून देणारे सध्याच्या कलियुगात ते एकमेव आहेत. गुरुदेवांनी अशा वाईट शक्तींना पाताळातून बाहेर यायला विवश करून त्यांची विविध रूपे समाजासमोर आणली. ‘वाईट शक्ती कार्य कशा करतात ? मनुष्याचे मन आणि बुद्धी यांवर त्या कशा आक्रमण करतात ?’ हे गुरुदेवांनी दाखवून दिले. आरंभी धर्माचे काही जाणकार, समाजातील व्यक्ती आणि साधकांचे नातेवाईक यांनी याला विरोध केला. त्या विरोधाला न जुमानता गुरुदेवांनी अनेक वर्षे न थकता हे कार्य केले. केवळ ‘देवता’ हा विषय स्वीकारणे आणि ‘वाईट शक्ती’ या अंगाचा विचार न करणे, म्हणजे ‘धर्माचे केवळ एकच अंग जाणण्यासारखे आहे’, हे अप्रिय सत्य हिंदूंना सांगू शकतो आणि त्याचे प्रमाण देऊ शकतो’, असे अवतारी कार्य ज्यांनी केले, ते म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
मोठ्या वाईट शक्तींनी केलेली सूक्ष्मातील आणि स्थुलातील प्राणघातक आक्रमणे झेलून साधकांच्या रक्षणासाठी जणू शिवासारखे हलाहल विष प्राशन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावरील वाईट शक्तींचे आक्रमण


देवता, ॠषि आणि महायोगीपुरुष हे ब्रह्मांडरक्षक आहेत; कारण त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा आहे. सकारात्मक ऊर्जेला विरोध करणारी नकारात्मक ऊर्जा असलेली तुल्यबळ शक्ती म्हणजे वाईट शक्ती ! ज्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘भूत, पिशाच, चेटकीण, राक्षस, पाताळातील बलाढ्य मायावी शक्ती, तसेच वाईट शक्ती’ यांच्या विश्वात जाऊन त्यांचे मंथन करण्याचे ठरवले, त्याच वेळी त्यांना हे ठाऊक होते की, ‘या सर्व वाईट शक्ती चवताळून सर्वशक्तीनिशी त्यांच्यावर आक्रमण करतील !’ जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा त्यातून निर्माण झालेले हलाहल विष शिवाने प्राशन केले आणि देवता अन् विश्व यांचे रक्षण केले. वर्ष १९९९ पासून आजपर्यंत गुरुदेव डॉ. आठवले यांनी ‘वाईट शक्तींचे’ नानाविध प्रकारे मंथन केले. त्यांचे स्थान शोधून त्यांचे घर (सूक्ष्मातील स्थान) नष्ट करण्याचे ठरवले आणि तसे केले. ‘लिखाण, व्यक्ती, साधक, निर्जीव वस्तू, चित्र, अन्न, वृक्ष, भूमी’ इत्यादींमध्ये वाईट शक्ती लपल्या होत्या. गुरुदेवांनी त्या सर्वांसाठी सूक्ष्मातून नामजपादी उपाय केले. मोठ्या वाईट शक्तींनी सर्वशक्तीनिशी गुरुदेवांवर मोठी आक्रमणे केली आहेत. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असलेल्यांना हे सर्व ठाऊक आहे. वाईट शक्तींनी केलेल्या प्रत्येक आक्रमणाच्या लाटेत काही सहस्रो साधक वाहून गेले असते. ती विषाची लाट ज्यांनी स्वतःवर घेतली, सर्व विष पचवले आणि साधकांचे रक्षणही केले, ते ईशस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले होय ! ‘ही विषारी आक्रमणे किती मोठी होती’, हे जाणण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताचे प्रदर्शन अवश्य पहावे. त्यामुळे त्याची थोडीफार कल्पना आपल्याला येऊ शकते.
यावरून जो साधकांसाठी हलाहल विष प्राशन करू शकतो, तो भगवंताचा अंश असला पाहिजे. तो आपल्या सर्वांसारखा सामान्य मनुष्य तर नसणारच ! कलियुगात ‘माया’ नावाच्या पडद्याच्या आड लपलेला हा ईश्वरी नट स्तुती आणि कीर्ती यांची अपेक्षा न करता सनातन धर्मसंस्थापनेचे लक्ष्य ठेवून पुढे जात असलेला मनुष्य रूपातील नारायण आहे. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच त्यांचे लक्ष्य आहे. श्रीविष्णूच्या मकर राशीत ज्यांचा जन्म झालेला आहे, भारताच्या पश्चिमेत जे अवतरले आहेत, ज्यांनी मनुष्य रूपातील साधकांची विशाल सेना सिद्ध केली आहे आणि वैकुंठातील श्रीमन्नारायणाचे पृथ्वीवरील जे मूर्तीमंत रूप आहेत, ते म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
|