(टीप : ‘गजवा-ए-हिंद’ म्हणजे काफीरांना ठार करण्यासाठीचे युद्ध !)
भारत आज विकास, विज्ञान-तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य यांच्या दिशेने वाटचाल करत असतांनाच, एक अंतर्गत धोका दिवसेंदिवस गडद होत आहे तो म्हणजे ‘गजवा-ए-हिंद’चा धोका ! ‘गजवा-ए-हिंद’ म्हणजे एकप्रकारे भारतात जिहादी राष्ट्र स्थापनेच्या दिशेने उचललेली कट्टरपंथीय पावले ! ही केवळ विचार, कल्पना नाही, तर प्रत्यक्षात कार्यवाहीत आणण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल जिहाद हे याच ‘गजवा-ए-हिंद’चे छोटे रूप आहे. इसिस, अल कायदा, अन्सार-उल-इस्लाम, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) यांसारख्या संघटना सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये विष पेरत आहेत. त्यांचे स्थानिक समर्थन करणारे ‘स्लीपर सेल्स’ (छुपे गट) भारतात हळूहळू पाळेमुळे रोवू पहात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालांनुसार भारतातील अनेक ठिकाणी, विशेषतः केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत इसिसशी संबंधित आतंकवादी कारवाया उघडकीस आल्या आहेत. शिक्षित तरुणांना लक्ष्य करून त्यांच्या विचारसरणीचा वापर करून त्यांना जिहादच्या मार्गावर नेले जात आहे.
यामागे केवळ हिंसाचार नाही, तर भारतात ‘खिलाफत’ प्रस्थापित करण्याचा दुष्ट हेतू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आपण ‘निधर्मी’ राष्ट्रात सुरक्षित आहोत का ? त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पावलांवर पाऊल ठेवून आता भारताला पुन्हा एकदा ‘सनातन राष्ट्र’, ‘हिंदु राष्ट्र’, ‘रामराज्य’ बनवण्यासाठी सज्ज व्हावे लागेल; कारण ही हिंदूंच्या अस्तित्वाची, सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानाची लढाई आहे. ‘गजवा-ए-हिंद’ला ‘सनातन राष्ट्र’ हेच एकमेव उत्तर आहे’, हे हिंदूंच्या मनावर अंकित करावे लागेल.
१. आतंकवादाला धर्म असतो, याची प्रचीती !
नुकताच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवाद्यांनी केलेल्या क्रूर आक्रमणात २८ जणांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे चालूच आहेत. आज पुन्हा काश्मीरमध्ये हिंदु मारले गेले, जात विचारली नाही, केवळ हिंदु आहेत का ? एवढेच विचारले ! २८ हिंदूंनी त्यांच्या प्राणांचे मोल देऊन ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध केले आहे. मुंबईमध्ये १९९२-९३ च्या दंगलीच्या वेळी ‘राधाबाई चाळ’ या घटनेने शहराला हादरवले होते. ही चाळ मुंबईतील जोगेश्वरी भागात आहे. जानेवारी १९९३ मध्ये या चाळीत ६ हिंदु नागरिकांना जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेमध्ये आक्रमणकर्त्यांनी धर्म ओळखूनच हिंदूंना लक्ष्य केले होते. अशा अनेक घटना हिंदूंवर विशिष्ट धर्माने केलेल्या अत्याचाराच्या साक्षी आहेत. पहलगाममध्ये जे घडले, तेच बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये घडत आहे; सनातनी क्षेत्रांवर, सण-उत्सवांवर, मंदिरांवर, महिलांवर आणि संपूर्ण हिंदु समाजावर, तसेच संपूर्ण जगभरात अशाच प्रकारे हिंसा अन् नरसंहार चालू आहेत. पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाचे दायित्व ‘द रेझिस्टन्स फोर्स’ (टी.आर्.एफ्.) या आतंकवादी संघटनेने स्वीकारले आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे मोठे षड्यंत्र पाकची गुप्तचर संघटना ‘आय.एस्.आय.’ आणि ‘पी.एफ्.आय.’ यांनी रचल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले आहे.
२. आतंकवाद्यांना भारतात हवे आहे ‘गजवा-ए-हिंद’ !
इसिस, पी.एफ्.आय. आणि अफगाणिस्तानमधील ‘इसिस-के’ यांनी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे षड्यंत्र रचले आहे. ‘इसिस-के’ काश्मीरमध्ये ‘स्लीपर सेल्स’ म्हणून सक्रीय आहे, तसेच सामाजिक माध्यमांमध्ये ‘प्रपोगंडा’द्वारे भारतातील तरुणांना या संघटनांमध्ये भरती करत आहे. केरळ, बंगाल, कर्नाटक, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर येथील स्थानिक कट्टरतावादी गटांशी संबंधित असलेल्या ‘स्लीपर सेल्स’चा धोका आहे. यामुळे भारताला या धार्मिक कट्टरतेपासून मुक्त करण्यासाठी सनातन राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे.
३. इस्लामिक स्टेटची छुपी रणनीती
‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) ही आतंकवादी संघटना इराक-सीरियात अत्यंत क्रौर्याच्या कृत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. वर्ष १९९० मध्येच काश्मीरमध्ये ‘निझाम-ए-मुस्तफा’, म्हणजेच इस्लामिक स्टेटचा प्रारंभ झाला होता. आजही इसिसचा धोका कायम आहे. वर्ष २०२४ मध्ये मॉस्कोमध्ये आणि वर्ष २०२५ मध्ये न्यू ऑर्लिन्समध्ये इसिसप्रेरित आक्रमणे झाली. जरी त्यांचे भौगोलिक नियंत्रण संपले असले, तरी त्यांच्या गुप्त गट, विचारधारा आणि प्रेरणेतून होणारी आक्रमणे ही जागतिक सुरक्षेसाठी अन् भारतातील सामाजिक शांततेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. त्यांनी त्यांची रणनीती पालटली आहे. थेट युद्धाऐवजी छुपा घात, विचारधारात्मक प्रचार आणि स्थानिक गटांना प्रेरणा देणे, हे आता त्यांच्या कारवायांचा केंद्रबिंदू आहे.
४. हिंदू सुरक्षित आहेत का ?
इसिसव्यतिरिक्त भारतासाठी धोका ठरू शकणार्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिजबुल मुजाहिदीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा इन इंडियन सबकाँटिनंट, स्थानिक इस्लामी कट्टर गट (केरळ, बंगाल, तमिळनाडू येथील), स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या ८ प्रमुख आतंकवादी संघटना, तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर हे भारताच्या सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका आहेत. अहिंदूंची वाढती लोकसंख्या ही देश आणि हिंदु धर्म यांसाठी धोक्याची घंटा आहे. या व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात हिंदूंना आत्मपरीक्षण करायला लावणार्या अनेक घटना घडल्या. मुसलमानबहुल मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांधांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. अनेक हिंदूंची घरे, दुकाने लुटण्यात आली आणि त्यांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे घाबरलेल्या ४०० हून अधिक हिंदूंनी तेथून पलायन केले. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात मुर्शिदाबाद, मालदा, नाडिया, दक्षिण २४ परगणा हे ४ जिल्हे अशांत झालेले आहेत. बंगाल, बिहार, तसेच महाराष्ट्र या राज्यांत धर्मांधांनी घडवून आणलेला हिंसाचार आता हळूहळू भारतातील इतर राज्यांमध्येही पसरत आहे. देशातील जिहादी गट, छुपे गट आणि त्यांना समर्थन देणारे धर्मांध भारतासाठी मोठे आव्हान आहेत.
५. हिंदूंना ध्येय मिळाल्यामुळे ‘सनातन राष्ट्रा’च्या दिशेने वाटचाल !
हिंदूंना ध्येय मिळाल्यामुळे त्या दिशेने हिंदूंची वाटचाल चालू आहे. पूर्वी सर्व हिंदु संघटना वेगवेगळ्या लढत होत्या; पण ‘सनातन राष्ट्र’ हे ध्येय दिल्यामुळे या सर्व संघटना एकत्र आल्या. विचार आणि कार्य जरी भिन्न असले, तरी आता सर्वांचे ध्येय एकच आहे. त्यामुळे सामूहिक प्रयत्नातून हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. लोकसभेत २ एप्रिल २०२५ या दिवशी वक्फ सुधारणा विधेयक संमत झाले आणि अमर्याद अधिकार असलेल्या ‘वक्फ बोर्डा’च्या धर्मांध शक्तीला चाप बसला. तमिळनाडू, केरळ यांसारख्या राज्यांत सरकारच्या कह्यात असलेली मंदिरे मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे आणि आंदोलने होत आहेत. अनेक शहरांमध्ये बेकायदेशीर मशिदी, दर्गे यांवर कारवाई करून जागा मोकळी केली जात आहे. काही राज्यांत लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदे लागू करण्यात आले आहेत. मथुरा आणि काशी मुक्ती आंदोलनाला गती मिळाली आहे. ज्ञानवापी आणि श्रीकृष्ण जन्मभूमीवरील कायदेशीर लढ्यांमध्ये हिंदूंना सकारात्मक निर्णय मिळवण्यासाठी न्यायालयीन हालचाली चालू आहेत. अनेक राज्यांनी समान नागरी कायदा लागू करण्याची प्रक्रियाही चालू केली आहे.
६. ‘गजवा-ए-हिंद’च्या जिहाद विरुद्ध ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद !
जिहाद, आतंकवाद, इस्लामी अतिक्रमण या ‘गजवा-ए-हिंद’च्या षड्यंत्राला, ‘नॅरेटिव्ह’ला (खोट्या कथानकाला) ‘सनातन राष्ट्र’च संपवू शकते, हे वरील घटनांमधून स्पष्ट होते. ‘गजवा-ए-हिंद’ ही विकृत रणनीती उद्ध्वस्त करण्यासाठी ‘सनातन राष्ट्र’ हीच प्रभावी दिशा आहे. या हेतूने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात‘गजवा-ए-हिंद’च्या जिहादी विचारसरणीविरुद्ध शंखनाद होणार आहे. सनातन राष्ट्राच्या या दिव्य शंखनादापुढे ‘गजवा-ए-हिंद’चा टिकाव लागू शकणार नाही.
‘गजवा-ए-हिंद’सारख्या विचारांच्या विरोधात आपल्याला धर्माभिमान, एकजूट आणि सनातन मूल्यांची मशाल हाती घ्यावी लागेल. ‘गजवा-ए-हिंद’सारख्या विघातक प्रवृत्तींना संपवायचे असेल, तर समाजहित, न्याय आणि धर्मनिष्ठतेवर आधारलेले छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्य संकल्पनेपासून प्रेरणा घेतलेले ‘सनातन राष्ट्र’च निर्माण करावे लागेल. ‘गजवा-ए-हिंद’चा प्रारंभ कुठूनही होऊ दे, त्याच्या शेवटाचा प्रारंभ हा ‘सनातन राष्ट्रा’तूनच होईल, हे नक्की !
संकलक : श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था.
‘सनातन राष्ट्र’च सर्वांचे रक्षण करू शकते !
सहस्रो वर्षांपासून कट्टरपंथीय भगव्या भारताला हिरवे बनण्याची वाटच पहात आहेत. पूर्वीच्या काळातील जिहादी आक्रमकांनी केवळ भारतातील संपत्ती लुटली नाही, तर या भूमीतून हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि हिंदू यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या काळी हिंदूंनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. आता हेच स्वप्न बाळगून जगभरातील जिहादी, आतंकवादी आणि धर्मांध भारताला अन् हिंदूंना लक्ष्य करत आहेत. ‘गझवा-ए-हिंद’ हे ध्येय धर्मांधांना पहिल्यापासून दिलेले आहे. त्यामुळे ते त्यांच्या मार्गावर चालले आहेत; पण आतापर्यंत हिंदू त्यांना कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत; कारण त्यांच्या समोर कोणतीही दिशा नव्हती, ध्येय नव्हते. यासाठी पोटा, टाडा यांसारखे मोठे कायदे करूनही याला आळा घालता आला नाही. हिंदूंना नेहमी मार खावा लागला. यावर एकच उपाय आहे – प्रतिउत्तर देण्याचा किंवा स्वसंरक्षण करण्याचा ! हा उपाय ‘सनातन राष्ट्राच्या स्थापनेतून’च मिळू शकतो. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेच्या स्थापनेपासून हिंदूंना हिंदू राष्ट्र, सनातन राष्ट्र हे ध्येय दिले. त्यामुळे सगळ्या हिंदूंना दिशा मिळाली. त्यामुळे जिहादी जे जे षड्यंत्र करत होते, त्यात लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद असेल, ती हळूहळू विफल होत आहेत. त्यामुळे ‘गझवा-ए-हिंद’ची रणनीती सनातन राष्ट्रामुळे उद्ध्वस्त होऊ लागली आहे.
– श्री. अभय वर्तक