‘मामनुस्मर युद्ध्य च’ ।  

श्री शिवछत्रपतींपासून कर्मवीर लोकमान्य टिळक, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत सारे राष्ट्रोद्धारक ज्या गीतेच्या तेजस्वी शिकवणीने हिंदु समाज जागृत करू शकले, तीच शिकवण भारताच्या सर्वांगीण उन्नत्तीला कारणीभूत होणारी आहे, हे निःसंशय !

‘स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४५), म्हणजे ‘आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत्प्राप्तीरूप परमसिद्धीचा लाभ होतो.’ ‘स्वकर्म’ कोणते, हे कळण्याइतपत हिंदु मात्र आता जागा झाला आहे. हिंदु समाज जेणेकरून बलवान, ओजस्वी, तेजस्वी आणि स्वतंत्र होईल, असे कार्य करणे, हेच प्रत्येक हिंदूचे ‘स्वकर्म’ नव्हे काय ?

हा उपदेश नाही किंवा व्याख्यानबाजी तर नाहीच नाही. अगदी रोकडा, प्रत्यक्ष आणि सत्य व्यवहार आहे. ख्रिस्त्यांनी एका हातात ‘बायबल’ ठेवून धर्मविस्तार केला. कुराण हातात घेऊन दुसर्‍या हातातील खङ्गाने सारे जगच इस्लाममय बनवावयास निघालेले महंमदीही जगाच्या चांगले परिचयाचे आहेत; पण आम्हा हिंदूंना गीतेचे तत्त्वज्ञान कुणावर लादण्यासाठी खङ्गाचा आश्रय करायचा नसून आमच्या उत्कर्ष पथावर आडव्या पडणार्‍या विरोधकांचाच समाचार घेण्यासाठी आम्ही खङ्ग हाती घेतले तर घेऊ. आमचा रस्ता कुणी स्वजनांनी किंवा परजनांनीही अडवू नये; कारण भगवान् श्रीकृष्ण ज्या रस्त्याने गेले, तोच मार्ग ‘मामनुस्मर ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ८, श्लोक ७), म्हणजे ‘माझे स्मरण कर’, या न्यायाने त्यांचे स्मरण करत करत अनुसरणे आम्हास प्राप्त आहे. मग त्यासाठी लढावे लागले, तरी ‘युद्ध्य च’ असा आदेशही श्रीकृष्णांनी आम्हास देऊन ठेवला आहे.

प्रत्यक्षातही हिंदु देवतांच्या मूर्ती फोडण्याचा प्रकार नित्य चालू असतांना, एखाद दुसरी तरी हिंदु स्त्री मुसलमानी गुंडांनी पळवून नेल्याचे वृत्त प्रतिदिन ऐकत असतांनासुद्धा ‘हिंदूंवर इस्लामचे अत्याचार होत नाहीत’, असे म्हणणारे हिंदूच पुढे यावेत याउपर दुसरी कोणती विपरित अवस्था असणार ? का असेच समजावयाचे की, जेव्हा प्रत्येक हिंदूच्या घराला इस्लामची ही चूड आग लावील; हिंदुमात्राच्या रक्ताचा अखेरचा थेंब संपेल आणि हिंदु म्हणून जे जे काही त्यांचे नामोनिशाणही पृथ्वीतलावर उरणार नाही, तेव्हा आम्ही अर्थात् परलोकात जागे होऊ ? अजून वेळ गेलेली नाही.  मुसलमानी अत्याचाराच्या पहिल्या तडाख्यात हिंदूंतील काही मोहरे गमावण्याची ही घातक परंपरा आता इथेच थांबली पाहिजे.

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने’, संचालक : अमरेंद्र गाडगीळ)