
नगर – पाकचे कंबरडे मोडण्याचे आणि आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय सैनिक हे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत सैनिक पाकचे अस्तित्व मिटवल्याविना रहाणार नाहीत. तारकेश्वर गड म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचा संगम आहे. नारायणबाबांनी गोरक्षण केले. मी मुख्यमंत्री असतांना गोरक्षकांना संरक्षण देण्याचे काम केले. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे. या ठिकाणी येऊन मला समाधान मिळते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते नगर-बीड सीमेवरील तारकेश्वर गडावरील कार्यक्रमात बोलत होते.