Ceasefire After US Mediation : अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत-पाक यांच्यात युद्धविराम !

नवी देहली – ६ मेच्या रात्रीपासून भारत आणि पाक यांच्यात निर्माण झालेली युद्धजन्यस्थिती वाढत असतांना अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोघांनी युद्धविरामाचा निर्णय घेतला. भारताकडून परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी याविषयी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती दिली. १० मेच्या सायंकाळी ५ पासून हे युद्धविराम लागू करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने यासाठी काही अटी घालून युद्धविराम करण्याला मान्यता दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अटी कोणत्या आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘एक्स’वर या संदर्भात पोस्ट करून माहिती दिली.

ट्रम्प यांनी म्हटले की,

मला हे घोषित करतांना खूप आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी सामान्य ज्ञान आणि उत्तम शहाणपणा दाखवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.