सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘ज्ञानगुरु’, ‘ग्रंथगुरु’ आणि ‘मोक्षगुरु’ बनून मानवजातीच्या उद्धारासाठी करत असलेल्या दैवी कार्याचे आध्यात्मिक विवेचन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रेष्ठतम असणार्‍या गुरुपदावर आरूढ आहेत. या पदावर राहून ते धर्मनिष्ठांना धर्मगुरु, साधकांना मार्गदर्शक गुरु, साधकांना सद्गुरु, शिष्यांना आत्मगुरु आणि संपूर्ण विश्वाला विश्वगुरु म्हणून अविरतपणे मार्गदर्शन करत आहेत. ते संपूर्ण विश्वाला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान देणारे ‘ज्ञानगुरु’ अन् गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या जिवांना जीवनमुक्ती आणि मोक्ष प्रदान करणारे ‘मोक्षगुरु’ आहेत. जेव्हा ते सनातन संस्थेच्या ग्रंथांच्या संदर्भात कार्य करत असतात, तेव्हा ते ‘ज्ञानगुरु’ बनून हे अवतारी कार्य पूर्णत्वास नेतात. त्यांच्या ‘ज्ञानगुरु’ या रूपाच्या दैवी कार्याचे सविस्तर विवेचन या लेखात केले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने दिव्य ज्ञान प्राप्त करणारे सनातनचे संत आणि साधक

१. प्रश्न : माझ्याकडून ग्रंथलिखाणाचे कार्य अधिक प्रमाणात व्हावे, यासाठी देव मला सूक्ष्मातून ज्ञान न देता ते साधकांच्या माध्यमातून देत आहे. असे आहे का ? – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२.२.२०२५)

२. उत्तर

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘ज्ञानगुरु’ आणि ‘ग्रंथगुरु’ बनून अखिल मानवजातीचा सर्वंकष उत्कर्ष करणार असणे : सध्या पृथ्वीवरील बहुतांश धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान नष्ट झालेले आहे. त्यामुळे स्थूल जगतासह सूक्ष्म जगताविषयीचेही ज्ञान लुप्त झाले आहे. ‘पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची निर्मिती करून धर्मसंस्थापना करण्याच्या अवतारी कार्याला ज्ञानशक्तीचे पाठबळ मिळून हे अवतारी कार्य लवकर पूर्णत्वास जावे’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे सनातनच्या ग्रंथांचे लिखाण आणि संकलन करून संपूर्ण विश्वाला धर्मज्ञान, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान देत आहेत. यांच्या या कार्यासाठी श्री गणेश प्रतिभा, प्रज्ञा, मेधा इत्यादी दैवी बुद्धींच्या स्वरूपात आणि साक्षात् माता सरस्वती ज्ञानगंगेच्या स्वरूपात अवतरित होऊन सनातनचे ग्रंथ सिद्ध करत आहेत. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे कलियुगात अजरामर रहाणार्‍या सनातनच्या ग्रंथांच्या रूपाने ‘ग्रंथगुरु’ बनून केवळ वर्तमानकाळातीलच नव्हे, तर भविष्यकाळातीलही अनेक पिढ्यांना ग्रंथरूपाने धर्म आणि अध्यात्म यांचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे जिज्ञासू, मुमुक्षू, धर्माभिमानी, साधक, शिष्य, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार’ अष्टांगयोगाची साधना होऊन त्यांची व्यष्टी स्तरावर आध्यात्मिक उन्नती होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना पृथ्वीवर स्थापन झालेले रामराज्यरूपी धर्मराज्य किंवा हिंदु राष्ट्र चालवण्याचे मार्गदर्शन ग्रंथांतून देऊन त्यांच्याकडून समष्टी साधना करवून घेणार आहेत. अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘ज्ञानगुरु’ आणि ‘ग्रंथगुरु’ बनून अखिल मानवजातीचा सर्वंकष उत्कर्ष करणार आहेत.

२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रश्न विचारतात, तेव्हा ते सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांमध्ये प्रश्नरूपी ज्ञानबिजाचे रोपण करून, त्या ज्ञानबिजाचे रोप अंकुरित करून त्याचा उत्तरमय ज्ञानवृक्ष सिद्ध होतो ! : श्री गुरुकृपेमुळे सनातनच्या काही साधकांची बुद्धी साित्त्वक होऊन त्यांच्यामध्ये प्रतिभा, प्रज्ञा आणि मेधा या सूक्ष्म बुद्धीचे प्रकार जागृत होत आहेत. त्यामुळे जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारतात, तेव्हा ते त्या साधकांमध्ये प्रश्नरूपी ज्ञानबिजाचे रोपण करतात आणि त्या ज्ञानबिजाचे रोप अंकुरित होऊन त्याचा उत्तरमय ज्ञानवृक्ष सिद्ध होतो. श्री गुरुकृपेमुळेच विश्वमनाशी अनुसंधान होऊन एखादा कार्यक्रम, घटना किंवा धार्मिक विधी यांचे सूक्ष्म परीक्षण करता येते. तसेच सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विश्वबुद्धीशी अनुसंधान साधून धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भातील प्रश्नांची सूक्ष्मातून उत्तरे मिळू लागतात. ज्याप्रमाणे द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि महर्षि व्यासांनी श्री गणेशाच्या माध्यमातून ती लिहिली, त्याप्रमाणे कलियुगात श्रीकृष्णाचे अंशावतार असणारे ज्ञानगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे साधकांना स्थुलातून प्रश्न विचारतात आणि तेच सूक्ष्मातून ज्ञान देऊन त्याच प्रश्नांची उत्तरे त्यांना देतात. त्यामुळे स्थुलातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे जरी सूक्ष्म ज्ञान प्राप्त करत आहेत’, असे दिसले नाही, तरीही तेच साधकांना सूक्ष्मातून ज्ञान देतात. सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक हे केवळ गुरुदेवांनी सूक्ष्मातून दिलेले ज्ञान ग्रहण करणारे माध्यम आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांची अवस्था ‘भक्ताची’ (द्वैताची अवस्था) असते, जेव्हा ते ज्ञानाची सत्यता पडताळतात, तेव्हा त्यांची द्वैत-अद्वैत अवस्था असते, म्हणजे ते भक्त अन् भगवंत यांच्यामधील ‘कैवल्य मुक्तीच्या’ अवस्थेत असतात. तसेच जेव्हा ते प्रश्नाचे उत्तर पडताळून त्याचा ग्रंथ संकलित करतात, तेव्हा त्यांची अवस्था ‘भगवंताची’ (अद्वैताची अवस्था) असते.’

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-ज्ञानाच्या संदर्भात केलेल्या विविध कृतींनुसार असणारी त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी ज्ञानावताराचे ‘ज्ञानगुरु, ग्रंथगुरु आणि मोक्षगुरु हे कार्य कलियुगाच्या अंतापर्यंत कार्यरत राहील ! : ‘प्रश्न विचारणे’ या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून काळानुसार क्रियाशक्तीच्या स्तरावरील आवश्यक असे गुरुतत्त्वाचे आणि अवतारी कार्य होत आहे. त्यांच्याकडून ज्ञानशक्तीच्या स्तरावरील ‘उत्तरे मिळवणे’ हे कार्य अपेक्षित नसल्याने त्यांना ज्ञानातून उत्तरे न मिळता ती सनातनच्या सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून काळानुसार क्रियाशक्तीच्या स्तरावरील कार्य चालू असल्याने ते ग्रंथांचे लिखाण आणि त्यांचे संकलन करण्याचे महत्त्वपूर्ण अवतारी कार्य करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी ज्ञानावताराचे ‘ज्ञानगुरु बनून मार्गदर्शन करणे, ग्रंथगुरु बनून चिरकाल अनुभूती देणे आणि मोक्षगुरु बनून साधकांना जीवनमुक्त करून मोक्ष देणे’ हे कार्य कलियुगाच्या अंतापर्यंत कार्यरत राहील.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये कार्यरत विविध दैवी बुद्धींमुळे सनातनच्या ग्रंथांच्या संदर्भात घडणारे कार्य

सुश्री (कु.) मधुरा भोसले

‘साधकांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान योग्य आहे कि अयोग्य ? तसेच हे ज्ञान कोणत्या ग्रंथात घेतले पाहिजे ?’, ही प्रक्रिया प्रत्यक्ष सूक्ष्म ज्ञान मिळण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि महत्त्वाची आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये कार्यरत असलेल्या विविध प्रकारच्या दैवी बुद्धींमुळे सनातनच्या ग्रंथांच्या संदर्भातील पुढील कार्य सुरळीतपणे होऊ शकते.

भगवंत शब्दांच्या स्तरावरील कार्य सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातील ज्ञान देऊन आणि समष्टी स्तरावर ज्ञानातून चैतन्य प्रक्षेपित करून साधनेचे बीज रोवण्याचे कार्य करतो. त्याचप्रमाणे शब्दजन्य कार्य म्हणजे ज्ञानाची सत्यता पडताळून त्या ज्ञानानुसार जिज्ञासू आणि मुमुक्षू यांना अनुभूती देण्याचे कार्य ! हे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ज्ञानगुरूंच्या रूपाने करत आहेत. जेव्हा ते पूर्णपणे शिवात्मा दशेत जातील, तेव्हा त्यांचे कार्य शब्दातीत होणार आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे जोपर्यंत शिवात्मा-शिवदशेत आहेत, तोपर्यंत भगवंत त्यांच्याकडून अधिकाधिक ग्रंथांचे संकलन करून ते मानवजातीपर्यंत पोचवण्याचे दैवी ज्ञानकार्य करत आहे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ग्रंथाच्या संदर्भातील ज्ञानगुरु, ग्रंथगुरु आणि मोक्षगुरु या स्वरूपातील अवतारी काय

वरील सर्व कारणांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून ग्रंथलिखाणाचे कार्य अधिक प्रमाणात व्हावे, यासाठी देव त्यांना सूक्ष्मातून ज्ञान न देता ते साधकांच्या माध्यमातून देत आहे.

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे भगवंताचे अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक