पहलगाम, बंगाल आणि पौड येथील अन्नपूर्णामाता मूर्ती विटंबनेचा निषेध !

वडगाव मावळ (पुणे) – पहलगाम आणि बंगाल येथील हिंदूंवर झालेले आक्रमण आणि पौड येथे हिंदु देवतांच्या (श्री अन्नपूर्णामाता मूर्ती) झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सकल हिंदु समाजाच्या वतीने ८ मे या दिवशी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मावळमध्ये विनाअनुमती वास्तव्य करणार्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
‘आक्रोश मोर्चा’चा प्रारंभ श्री पंचमुखी मारुति मंदिरांपासून करण्यात आला. मोर्चात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान मावळ, हिंदु राष्ट्र सेना मावळ, सह्याद्री प्रतिष्ठान मावळ, सफर ३६१ गडांची मावळ, भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चा पंचायत समिती चौकामध्ये आल्यानंतर त्याठिकाणी पदाधिकार्यांची भाषणे झाली. डोक्यावर भगव्या टोप्या, हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने हिंदु बांधव सहभागी झाले होते.
हिंदु संघटनांच्या मागण्या !
तालुक्यातील रस्त्याच्या कडेला, तसेच आठवडी बाजारपेठेत नोंदणीकृत नसलेले अनेक परप्रांतीय आणि बांगलादेशी नागरिक यांनी अतिक्रमण केले आहे. त्याची चौकशी व्हावी. तालुक्यात भाडे तत्त्वांवर रहाणार्या परराज्यातील नागरिकांची पोलीस पडताळणी करावी. तालुक्यात गड-दुर्गांवर झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करून बांधकामे त्वरित काढावी.