‘X’ Accounts Closed :  भारताच्या मागणीनंतर ‘एक्स’कडून ८ सहस्र खाती बंद

‘एक्स’ने खाती बंद केली नाही, तर दंड आणि कारावास अशी शिक्षा करण्याची भारताने दिली होती चेतावणी

नवी देहली – भारत सरकारच्या विनंतीवरून सामाजिक माध्यम ‘एक्स’ने भारतातील ८ सहस्रांहून अधिक खाती बंद केली आहेत. या खात्यांवरून भारतीय कायद्यांचे उल्लंघन केले जात असल्याने सरकारने ही विनंती केली होती.

‘जर भारत सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही, तर ‘एक्स’ला मोठा दंड आणि कारावास, अशी शिक्षा भोगावी लागू शकते’, अशी चेतावणी भारताकडून देण्यात आली होती. त्यानंतर ‘एक्स’ने ही खाती बंद करत म्हटले, ‘भारतात आमचे संकेतस्थळ बंद होण्यापासून रोखण्यासाठी सरकारच्या आदेशाचे पालन करत आहे.’