श्री गणेशमूर्तीसमोर हार आणि नारळ अर्पण करण्यास भाविकांना प्रतिबंध !

भारत-पाक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा निर्णय !

श्री सिद्धिविनायक मंदिर

मुंबई – भारत-पाकिस्तान युद्धाला प्रारंभ झाला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने भाविकांना श्री गणेशमूर्तीसमोर हार आणि नारळ अर्पण करण्यास प्रतिबंध घातला आहे. ‘या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे’, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.