राहुल गांधींनी क्षमा मागावी ! – मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

श्रीरामाचा अवमान केल्याचे प्रकरण

मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

नागपूर – राहुल गांधी यांचे वक्तव्य केवळ अज्ञान दर्शवणारे नाही, तर ते हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर योजनाबद्ध आक्रमण आहे. कोट्यवधींचे श्रद्धास्थान असणार्‍या श्रीरामाला काल्पनिक म्हणणे हा हिंदूंचा अवमान आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ क्षमा मागावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केली आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भगवान श्रीरामांच्या सहित सर्व गोष्टी काल्पनिक आहेत, असे विधान करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्या होत्या. अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना ब्राऊन विद्यापिठात त्यांनी हे वक्तव्य केले होते. यापूर्वीही वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याने न्यायालयाने त्यांना दम दिला आहे.

कर्नाटकमध्ये बजरंग दलाचे गोरक्षक सुहास शेट्टी यांची धर्मांधांनी निर्घृण हत्या केली, त्याविषयी कठोर कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असेही परांडे या वेळी म्हणाले.